शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

आठवणीतील दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 4:05 PM

धावत्या जगाशी स्पर्धा करताना आपल्याला आज प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते.

धावत्या जगाशी स्पर्धा करताना आपल्याला आज प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते. बदलत्या काळानुसार आजच्या दिवाळी सणाचे स्वरूपही बदलले आहे. पण ‘त्या बालपणीच्या दिवाळी’सारखा आजच्या दिवाळीत गोडवा नाही़ तो सुगंध नाही.पहिली सत्र परीक्षा संपल्यावर दिवाळीची सुटी लागली की, कधी एकदाचे मामाच्या गावाला जातोय, असे वाटायचे. दिवाळीच्या सणाला घरोघर सगळे अंगण भरून शेणाचा सडा टाकला जायचा. आकाशकंदिल लागत. आई व आजी रांगोळी काढत. मी सुद्धा हौसेपोटी संपूर्ण अंगणभर रांगोळी व चित्रे काढीत असे. ‘शुभ- दीपावली’ व ‘सुस्वागतम’ हे शब्द आमच्या दारा-अंगणात माझ्याच हस्ताक्षरात रांगोळीबद्ध होत असत. ‘याचे हस्ताक्षर चांगले आहे’, असे कुणी म्हटले की, मला एखादे मोठे बक्षीस मिळाल्यासारखे वाटे. या कौतुकामुळे पुढच्या दिवाळीलाही ही शब्दांची रांगोळी काढण्याची जबाबदारी मी स्वत:हून स्वीकारत असे. तशी माझी मानसिक तयार होई. खरे तर स्वत:हून अशी मदत करण्यातला निर्भेळ आनंद मी घेत असे.दिवाळीची मिठाई - लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळे हे सर्व आई व आजीला करू लागायचो. त्याचवेळी हे सर्व कसे झाले? याची तपासणी करण्यासाठी चव घेऊन पहाण्याची जबाबदारीही माझ्यावर यायची. मग मी एक - एक पदार्थ खाऊन पहायचो. सभोवतालचा गोड वास व चव घेतलेले पदार्थ यांमुळे माझे पोट भरून जायचे. नीटपणे येत काहीच नव्हते. पण मध्ये-मध्ये लुडबूड करून जमेल तेवढी मदत करायचो. नवे कपडे आणण्याची लगबग असायची. टिकल्या, पिस्तुल, नागाच्या गोळ्या, लवंगी फटाके, भुईचक्र, भुईनळ व काही थोडेसे मोठे फटाके अशी आमची दिवाळीची शस्त्र सामुग्री असायची. गल्लीमध्ये एकजण फटाका वाजवायचा आणि बाकी सर्वजण त्याचा आनंद घ्यायचे़ नंतर दुसऱ्याचा नंबर यायचा़ असे आळीपाळीने फटाके वाजविण्याची मज्जा काही औरच!पूर्वीची दिवाळी साधी होती़ पण शांतता व समाधान देणारी होती. माणसं साधी होती. साध्या साध्या गोष्टींतून आनंद मिळवणारी होती. आजोबांबरोबर मळ्यात गेल्यावर आनंदाने हंबरणारी गाय मला दिसायची. वर्षभर गोठ्यातील पाळीव प्राण्यांची मनापासून काळजी घेणारे आजोबा दिवाळ सणाला त्यांना गोडधोड खाऊ घालत. त्यांची पूजा करत. आजीच्या हातचे फराळाचे पदार्थ येता-जाता खात़ मी पुन्हा मित्रांबरोबर खेळायला जायचो. दिवसभर हुंदाडायचो. नंतर घरात थोडीशी मदत करायची, असा दिनक्रम असे.सुटीला येणारे पाहुणे, त्यांचे आदरातिथ्य यात वेळ जायचा. आमच्या घरातले वातावरण सुशिक्षित, सुसंस्कारित असल्यामुळे घरात नेहमी वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके असत. दिवाळीच्या गोड फराळाबरोबर मला नेहमीच विविध मासिकांची व विविध दिवाळी अंकांची संगत लाभली. त्यातील कविता वाचून आपणही अशी एखादी बालकविता लिहावी, असे वाटत रहायचे. योगायोगाने नंतरच्या काळात माझ्या काही कविता महाराष्ट्रातील विविध दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या.आज आजी -आजोबा हयात नाहीत. गावाकडचं घर - अंगण ओस पडलंय. कधी काळी हिरवंगार असणारं शेत साद घालतंय़ प्रत्येक दिवाळी सणाला गावाकडची ती ‘दिवाळी’ माझ्या मनात डोकावते़ आजची दिवाळी अधिक चमचमीत, अधिक चकचकीत आहे़ पण या दिवाळीला तो सडा-सारवणाचा दरवळ नाही़ नात्यांचा तो ‘गोडवा’ नाही़ ही रुखरुख प्रत्येक दिवाळी सणात मनाला खात राहते.

प्रा. सुदर्शन धस, (लेखक रयत शिक्षण संस्थेत अध्यापक असून, साहित्यिक आहेत.)

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर