शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

पिचडांनी ४० वर्षे गवत काढले काय? शरद पवारांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 2:07 PM

अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे  गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.

अकोले : अकोले तालुक्यातील विकासासाठी सहकार्य केले.  भंडारदरा धरणाच्या पाण्याचे फेरवाटप करून तालुक्याला हक्काचे पाणी दिले. पाण्याच्या योजना केल्या. आदिवासीच्या उन्नतीसाठी योजना केल्या आणि ते राष्ट्रवादीला सोडून गेले. लोकशाही आहे. त्यांना जाऊ  द्या. पण सांगतात काय तर विकास करण्यासाठी गेलो. मग त्यांनी ४० वर्षे  गवत काढले काय ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माजीमंत्री मधुकर पिचड यांना केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ.किरण लहामटे यांच्या प्रचारार्थ अकोले येथील  बाजारतळावर रविवारी झालेल्या प्रचारसभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासींसाठी आम्ही केलेल्या कायद्याचे उल्लंघन करून त्यांनी  भलत्याच तालुक्यात विकास केला. त्याचे शुक्लकाष्ट मागे लागू नये म्हणून ते तिकडे गेले. त्यांना धडा शिकविण्याची संधी सोडू नका. डॉ. लहामटे यांना साथ द्या, असे आवाहन पवार यांनी केले.आदिवासींच्या उन्नतीसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले गेले. रोजगार हमी कायदा, मंडल आयोग अंमलबजावणी, शेतक-यांना कर्ज माफी ही कामे मी मुख्यमंत्री असताना केली. राज्यातील औद्योगिक वसाहतींना चालना देत बेरोजगारी कमी करण्यासाठी काम करताना राज्य देशात एक नंबर वर नेऊन ठेवले. गेल्या पाच वर्षात राज्याची अधोगती झाली आणि बेकारी वाढली, असा आरोप करीत राज्यात सत्ता बदल करण्यासाठी तरुणाई सरसावली आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. याप्रसंगी दशरथ सावंत, डॉ अजित नवले, विनय सावंत, अशोक भांगरे, अमित भांगरे, डॉ. लहामटे यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019