शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

संगमनेर तालुक्यातील पठार भागात वादळी वाऱ्याने पिकांसह घरे, दुकानांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 7:55 PM

संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी ( दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांसह घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे.

पठार भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठेेे नुकसान झाले आहेेे. रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. त्यात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुंजाळवाडी पठार, कर्जुले पठार, सारोळे पठार, सावरगाव घुले, डोळासणे आदी गावांच्या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली. गुंजाळवाडी पठार गावांतर्गत असलेल्या काटवनवाडी येथील प्रशांत बाळू दुधवडे यांचे घर पूर्णपणे उद‌्ध्वस्त झाले. घरातील धान्य पावसात भिजले असून, संपूर्ण संसार उघड्यावर पडला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते वादळात त्यांच्या याच घराचे पत्रे उडाले होते. त्यानंतर त्यांनी घरावर नवीन पत्रे टाकले होते. रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने त्यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. वरुडी फाटा येथेही शंकर घुले यांचे पत्र्याचे शेड वादळाने उडून नाशिक-पुणे महामार्गावर पडले. नागरिकांच्या मदतीने ते बाजूला घेण्यात आले. कृष्णा दिवेकर यांच्या दुकानाचे पत्रे उचकटल्याने नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच गुंजाळवाडी पठार गावचे सरपंच रवींद्र भोर, माजी सरपंच संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट दिली. झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या एका गरीब दांपत्याचे घर कोसळले अन् क्षणातच संसार रस्त्यावर आला. सर्व नुकसानग्रस्तांना प्रशासनानेे मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरRainपाऊस