शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:25 AM

मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर काही ...

मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर काही गावातील शेतकऱ्यांना मिळाले होते तर काहींना मिळाले नव्हते. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावामधील शेतकरी या भरपाईपासून वंचित होते. अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पाथर्डी तहसीलदार यांना निवेदन देऊन चिचोंडी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन तहसीलदारांनी पाठपुरावा करून कोल्हार येथील २३८ शेतकऱ्यांचे ११ लाख ८४ हजार ८०० रुपये, शिराळ येथील ७४२ शेतकऱ्यांसाठी २६ लाख ७५ हजार ३०० तर शिंगवे केशव येथील ३६८ शेतकऱ्यांचे २९ लाख २२ हजार ४९९ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाल्याने संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, भाऊसाहेब करपे, जगन्नाथ जावळे, मेजर शिवाजी गर्जे, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, संतोष मगर, मदन पालवे, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड. संदीप जावळे, सरपंच शिवाजी पालवे, आजिनाथ पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, महादेव गर्जे यांनी परिश्रम घेतले.