शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

अवैध वाळूउपसा प्रकरणी ६ आॅगस्टला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:39 PM

जिल्ह्यातील वाळूच्या लिलाव प्रक्रियेला आव्हान देण्यात आलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देनिकालासाठी पडल्या चार तारखा : याचिकाकर्त्यांची लवकर न्यायनिवाडा करण्याची विनंती

अहमदनगर : जिल्ह्यातील वाळूच्या लिलाव प्रक्रियेला आव्हान देण्यात आलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, मंगळवारीही या प्रकरणी न्यायालयात काहीही आदेश झाला नाही. या निकालासाठी न्यायालयाने आता ६ आॅगस्ट ही तारीख दिली आहे. याप्रकरणी न्यायालयाने तातडीने आदेश करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी मंगळवारी न्यायालयात केली.जिल्ह्यात राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांत यावर्षी महसूल प्रशासनाने वाळूच्या लिलावाची जी प्रक्रिया केली ती बेकायदा असल्याने या प्रक्रियेला स्थगिती मिळावी तसेच पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीबाबत संबंधितांवर दंड आकारावा या मागणीची प्रातिनिधीक याचिका अ‍ॅड. श्याम असावा, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस व शेतकरी संपत जाधव यांनी येथील न्यायालयात दाखल केली आहे.या याचिकेवर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.पी. मोदी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. याचिकेवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड़ असीम सरोदे बाजू मांडत आहेत. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने पुढील आदेशासाठी सुरुवातीला १२ जुलै ही तारीख दिली होती. मात्र, त्या तारखेला आदेश झाला नाही. त्यानंतर १८ जुलै ही तारीख देण्यात आली होती. मात्र, त्या तारखेलाही आदेश न होता ३१ जुलै ही पुढील तारीख देण्यात आली होती. मात्र, मंगळवारीही न्यायालयाने आदेश केला नाही. आता ६ आॅगस्ट ही तारीख देण्यात आली आहे. वाळूउपसा हा गंभीर प्रश्न असल्याने न्यायालयाने लवकरात लवकर काय तो न्यायनिवाडा करावा, अशी विनंती न्यायालयात मंगळवारी याचिकाकर्ते अ‍ॅड. श्याम असावा यांनी केली. न्यायालयाने ६ आॅगस्ट ही पुढील तारीख दिली आहे. या खटल्यात प्रतिवादी असलेल्या वाळू ठेकेदारांना नोटिसा पोहोचल्या नाहीत याही कारणावरुनखटल्यात सुरुवातीला तारखा पडल्या होत्या.पर्यावरणाचे कायमस्वरुपी नुकसान - अ‍ॅड. सरोदेअंतिम न्यायनिर्णय होण्यासाठी मोठा कालावधी लागतो आहे याचा गैरफायदा वाळू उपसा करणारे नक्कीच घेत असतील. परंतु न्यायाला विलंब म्हणजे अन्यायच आहे हे तत्त्व प्रत्येकवेळी लागू करता येत नाही. सदर प्रकरणी संपूर्ण महाराष्टÑाचे अंतिम न्यायनिर्णयाकडे लक्ष लागले आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने निर्णय देण्यासाठी कधीकधी न्यायाधिशांना थोडा जास्त कालावधी लागू शकतो. परंतु आता आदेशासाठी पुरेसा कालावधी झालेला असल्याने ६ आॅगस्टला नक्कीच अंतिम न्यायनिवाडा करण्यात येईल, असा विश्वास आहे. पर्यावरणाचे कायमस्वरुपी नुकसान होत असताना अशाप्रकरणी न्यायनिर्णय देताना जास्त विलंब होऊ नये हे तत्त्व पाळले गेले पाहिजे, असे याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड़ असीम सरोदे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय