शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:13 PM

अहमदनगर शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.

अहमदनगर :  शहरात कोरोनाचे संकट गडद होत असताना महापौर बाबासाहेब वाकळे मात्र स्वत:च्या प्रभागातच क्वारंटाईन झाले आहेत. शहरातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, कोरोनाचा प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना व्यवस्थित राबविण्यात येतात की नाही हे पाहण्याऐवजी वाकळे आपल्या प्रभागातच गुंतले आहेत.नगर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना महापौर बाबासाहेब वाकळे  मात्र भागातून बाहेर पडायला तयार नाहीत. प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्थापन केलेल्या सुरक्षा समितीचा आढावा घेऊन त्यांनी सूचना केल्या. त्यामुळे वाकळे हे प्रभागाचे महापौर आहेत की शहराचे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.शहरावरील कोरोनाचे  संकट गडद झाले आहे. एकापाठोपाठ एक रुग्ण सापडत आहेत. महापालिकेकडून उपाययोजनाही सुरू आहेत. महापालिका प्रशासनाने नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर बाबासाहेब वाकळे हे प्रभाग क्रमांक सहाचे नेतृत्व करतात. त्यांनी गुरुवारी त्यांच्या प्रभागातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. ही बैठक त्यांनी सोशल डिस्टन्स पाळून घेतली. इतर प्रभागांतील समित्यांचे काय सुरू आहे ? याचा मात्र महापौरांना अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. वाकळे हे आपल्याच  प्रभागातील कामे मार्गी लावण्यात व्यस्त असतात, अशी त्यांच्यावर नेहमीच टीका केली जाते. इतर प्रभागात मात्र ते फारसे लक्ष देत नाहीत. त्यात कोरोनाच्या संकट काळातही ते आपल्याच प्रभागात तळ ठोकून आहेत. म्हणूनच वाकळे हे   शहराचे महापौर आहेत की त्यांच्या प्रभागाचे असा प्रश्न निर्माण होतो.सिद्धीबागेसमोरील गटारीचा प्रश्न, वादळी पावसात शहरात अनेक ठिकाणी झालेले नुकसान, बाहेरून शहरात लोक येत आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून शहरातील लोकांना भिती निर्माण झाली आहे. प्रभागातील लोकांना त्यांनी अन्नधान्य वाटप केले? पण शहरातील नागरिकांना काही अडचणी तर नाहीत ना? याकडे पहायला मात्र महापौरांना वेळ मिळेनासा झाला आहे. महापालिकेला कल्पक व कृतीशील आयुक्त लाभले आहेत. मात्र त्यांच्यासोबत बसून शहरातील सर्व ठाकठीक करण्यासाठीही त्यांना वेळ मिळेना असे दिसते आहे. शहरात भाजीपाला विक्रीला अद्यापही शिस्त आलेली नाही.  याबाबत चौकोन आखायलाही महापालिकेला वेळ मिळाला नाही की महापौरांना लक्ष घालायला वेळ मिळाला नाही.  चितळे रोड, डाळ मंडईत रोजच फिजिकल डिस्टन्सिगचा फज्जा उडतो. मात्र तिथे महापालिकेचे कोणतेही पथक अत्तापर्यंत गेलेले दिसून आले नाही.   अशा कितीतरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. मात्र त्याला उत्तर कोण देणार? हाच खरा प्रश्न आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर