शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अहमदनगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा : शाळांचे पत्रे उडाले, आंब्याचे नुकसान, साखर भिजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 7:55 PM

जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

ठळक मुद्दे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडाले, झाडे व वीज खांब आडवेसंगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजली

अहमदनगर : जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वा-यामुळे अनेक शाळांचे पत्रे उडून गेले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण शाळेचे पत्रे उडालेश्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण भागाला आज सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाचा फटका बसला. वादळामुळे शाळेवरील पत्रे उडाले तर ठिकठिकाणी झाडे व वीज खांब रस्त्यात आडवे झाले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या पावसाने देवदैठणला चांगलाच फटका बसला. वाघमारे वस्ती (मेखणी) येथील जुनी इमारत असलेल्या जिल्हा परिषद शाळेवरील सोळा पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. सर्व भिंतींना जागोजागी तडे गेले. मागील भिंतही पडली. गावात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली मोठी झाडी मुळापासून जागीच उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला. काही छपराची घरे, पोल्ट्रीचे पत्रे उडाले. गुंजाळ वस्तीवरील शेतीला वीज पुरवठा करणारे खांब पडल्याने या भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.संगमनरेमधील सारोळे पठारच्या शाळेचे पत्रे उडालेसंगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुपारनंतर वादळी वाºयासह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. सारोळेपठार व परिसरात गारपीट होऊन वादळी वाºयाने शाळेवरील पत्रेही उडाले. या पावसाचा डाळिंब व इतर नगदी पिकांना फटका बसला. वादळी वाºयासह झालेल्या पावसाने संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सारोळेपठार येथील शाळेवरील पत्रे उडून गेले.संगमनेरातील युटेक शुगरची २५ कोटींची साखर भिजलीसंगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथे आज वादळी वा-यासह झालेल्या आवकाळी पावसामुळे युटेक शुगर लिमीटेड साखर कारखान्याचे जवळपास ३४ कोटी रुपयाचे अर्थिक नुकसान झाल्याचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांनी सांगितले. ४ वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे कारखान्याच्या साखर गोदामाचे खांब निखळून पडले. गोदामाचे पत्रे १ किलोमीटर अंतरावर उडून पडले आहेत. विक्रीसाठी उपलब्ध असलेली सुमारे २५ कोटी रुपयाची साखर भिजली. सुदैवाने यावेळी कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही.कर्जत तालुक्यातील राशीनसह सिध्दटेक, खेडमध्ये वादळी पाऊसकर्जत तालुक्यातील राशीनसह परीसरातील बारडगाव, भांबोरा, चिलवडी, सिध्दटेक व खेड येथेआज दुपारी चारच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. वादळामुळे कांदा, चारा पिके भुईसपाट झाली असून खेडमध्ये आंब्याचे मोठे नुकसान झाले. राशीनचा मंमळवारी आठवडे बाजार होता. मात्र वादळी पावसामुळे बाजारकरूंची मोठी तारांबळ उडाली. वादळी वाºयामुळे कांदा, चारापिके भुईसपाट झाल्याने शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. खेड येथे आंब्याचा सडा पडला. चिलवडी, बारडगाव, सिध्दटेक येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाSangamnerसंगमनेरKarjatकर्जतKopargaonकोपरगाव