शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

विंचरणा नदीवरील बंधा-याचे वाहून गेलेले दरवाजे बसविले ३६ तासानंतर; बंधा-यात उरले फक्त २० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:44 PM

वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.

जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा काठोकाठ भरून वाहत होता. या बंधा-याला २१ मो-या आहेत. एका मोरीत आठ लोखंडी दरवाजे आहेत. एका मोरीतील बंधा-यातील खालच्या बाजूतील दोन दरवाजे जिर्ण झालेले असल्याने पाण्याच्या अतिउच्च दाबामुळे ते वाहून गेले. यामुळे या बंधा-यातील लाखो लिटर पाणी वाया गेले. हे दरवाजे बसवण्यासाठी गावक-यांनी खूप प्रयत्न केले. पण अतिदाबामुळे शक्य झाले नाही. अखेर पाणी ३६ तासानंतर कमी झाल्याने गावक-यांनी दरवाजे बसवले. पण तोपर्यंत २० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले होते.रत्नापूर येथील बंधा-यातील व पाटोदा येथील बंधा-यातील ओव्हरफ्लोचे पाणी विंचारणा नदीतून वंजारवाडी येथील बंधा-यात येत आहे. त्यामुळे बंधा-यात काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकतो. बंधा-यातील पाणी किती वाढते याकडे वंजारवाडी गावक-यांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर बंधारा हा चारगावासाठी वरदान ठरणारा आहे. या बंधा-यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरले असते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले असल्यामुळे गावक-यांना रडू आवरले नाही. ३६ तासानंतर ग्रामस्थांनी दरवाजे बसवले आहेत. वरील भागातील ओव्हरफ्लोचे पाणी पंधरा दिवस आणखी येत राहिल्यास बंधारा ७० ते ८० टक्के भरू शकतो.-आशा जायभाय, सरपंच, वंजारवाडी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड