शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

लाॅकडाऊननंतरच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत ४० विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:20 AM

जिल्हा परिषदेत गतवर्षी शेवटची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे अनेक सभा रद्द ...

जिल्हा परिषदेत गतवर्षी शेवटची सर्वसाधारण सभा फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे अनेक सभा रद्द कराव्या लागल्या. काही सर्वसाधारण व स्थायी समितीच्या सभा झाल्या, मात्र त्या ऑनलाईन लेखी प्रतिपादन पद्धतीने झाल्या. त्यामुळे सदस्यांना सभेत प्रत्यक्ष चर्चा करता येत नव्हती. दिवाळीनंतर अनेक सदस्यांनी सभागृहात सभा घेण्याची मागणी केली. मात्र कोरोनामुळे प्रशासन निर्णय घेत नव्हते. अखेर कोरोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने प्रत्यक्षात सभा घेण्यास परवानगी दिली असल्याने, आता जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा होणार आहे.

२६ फेब्रुवारीला होणाऱ्या सभेत विविध विभागाच्या प्रशासकीय मान्यता, बांधकामे आणि रस्त्याच्या कामांना मंजुरी यासह इतर असे एकूण ४० विषय ठेवण्यात आले आहेत. राज्य सरकारने जिल्हा परिषदेला काही महिन्यापूर्वी निधी दिला असून हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी प्रशासनाला घाईघाईने योजनांना प्रशासकीय मंजुरी द्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना ६० लाखाची शिष्यवृत्ती देणे, दलित वस्ती सुधार योजनेत ८० कोटीच्या निधीला मंजुरी देणे यासह ५०५४ लेखा शीर्षाखाली रस्त्यांच्या कामांना मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजनेतील रस्त्याच्या कामांना मंजुरी देणे, दुभत्या जनावरांना खाद्य देण्याच्या दोन कोटीची योजना, कृषी विभागाच्या विशेष घटक योजनांना प्रशासकीय मान्यता देणे, असे अनेक विषय या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.