जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली. यावेळी जि.प. परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळापहाड, सागर आगरकर, सुरेश भोजणे, नीलेश गाडेकर, चंद्रकांत पाचारणे, श्रीकांत ढगे, ऋषिकेश बनकर, श्यामसुंदर शेळके, लहानू उमाप, मीरा पतंगे आदी उपस्थित होते. शासनाने वर्ग चारची पदे निरसित करू नये, चतुर्थश्रेणीची २५ टक्के पदे निरसित करण्याचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, चतुर्थश्रेणी सेवांचे व कर्मचाऱ्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करू नये, अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट तात्काळ करावी, वेतन त्रुटीसंदर्भातील खंड दोनच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, सातव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत तसेच महागाई भत्त्याची थकबाकी त्वरित मिळावी, सन २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
--------
फोटो - २९परिचर
शासन दरबारी प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने शुक्रवारी जि.प. परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने केली.