शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पालकमंत्र्यांच्या उपकारावर जिल्हा परिषद मिळवली नाही : सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:22 IST

विखे परिवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे.

हळगांव : विखे परिवार अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. मात्र आम्ही श्रेय लाटण्यासाठी कधीच खोटेपणा केला नाही. पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून बोगसपणाचे राजकारण सुरू आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसने मिळवलेली सत्ता ही कुणी दान केलेली नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाने कष्ट घेतले. जिल्हा परिषदेची सत्ता पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपकारावर मिळवलेली नाही, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले.जामखेड तालुक्यातील हळगांव येथील श्री सिध्देश्वर दत्त देवस्थानच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी विखे बोलत होते.सुजय विखे म्हणाले, कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघात २५ वर्षापासून भाजपा सत्तेत आहे. तरीही मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. मतदारसंघात पालकमंत्र्यांकडून कोट्यावधी रुपयांच्या निधीच्या गप्पा मारल्या जातात मग हा निधी गेला कुठे? नुसते भूमीपूजन होत असतील अन विकास कामे होत नसेल तर मग पालकमंत्र्यांच्या फसवेगिरी विरोधात मी बोलणारच. आमची स्पर्धा पालकमंत्र्यांशी नाही तर माझे भांडण पालकमंत्री पदाशी आहे. ज्या दिवशी छावण्या पालकमंत्री सुरू करतील त्या दिवशी माझे भाजपाविरोधी भाषण बंद होईल, असे सांगत जोवर छावण्या सुरू होत नाहीत तोवर मी शेतक-यांचा आवाज बनून भाजपाविरोधात आपली भूमिका मांडत राहणार. दुष्काळात जनतेला दिलासा देण्यात पालकमंत्री अपयशी ठरत आहेत. ज्या पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला जातो ते काय जिल्ह्यातील दुष्काळावर जनतेला दिलासा देतील असा सवाल विखे यांनी केली. भाजपाने तीव्र, मध्यम, कमी असा नवीन दुष्काळ तयार करत जनतेची थट्टा चालवली आहे. एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिंदेंनी तीव्र, मध्यम व कमी दुष्काळाची नेमकी व्याख्या काय आहे हे जनतेला सांगावे.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटो अथवा न सुटो दक्षिणेचा गड कुठल्याही परिस्थितीत काबीज करायचाच आहे त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढवेन पण भाजपसोबत जाणार नाही अशी घोषणा करत लोकसभेचे मैदान मारण्यासाठी आपण सज्ज झालो असल्याचे सांगत आपली पुढील दिशा स्पष्ट केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ नेते किसनराव ढवळे हे होते. यावेळी सिध्देश्वर दत्त देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादा महाराज रंधवे, सरपंच अनिता सुशेन ढवळे, राजेंद्र ढवळे, किसनराव ढवळे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय ढवळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेभात, युवकचे अध्यक्ष अमोल राळेभात, लतिफभाई शेख, बबनराव तुपेरे, आप्पासाहेब उबाळे, धनगर समाजाचे जेष्ठ नेते मारूती करगळ, अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे अध्यक्ष आबासाहेब ढवळे, डॉ अविनाश पवार, राजुभैय्या सय्यद, फक्राबादचे सरपंच विश्वनाथ राऊत, धनेगांवचे सरपंच कल्याण काळे, कृष्णा चव्हाण, कांतीलाल ढवळे, भिमराव डूचे, नानासाहेब ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय ढवळे यांनी केले तर सुत्रसंचालन हनुमंत निकम यांनी केले.छावण्या कधी सुरु करणाररस्ते नको, मंदिर नको आता दुष्काळात जनतेला पिण्याचे पाणी व पशुधन जगवण्यासाठी चारा छावण्या कधी सुरू करणार याची तारिख पालकमंत्री राम शिंदेंनी जाहिर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांच्या नियोजनाच्या कौशल्यावर विश्वास दाखवत मोठी जबाबदारी सोपवली आहे. आता नियोजनाचे कौशल्य शिंंदे यांनी दाखवावं. नियोजनाचे कौशल्य दाखवले तर विधानसभेला त्यांचा प्रचार करेन, असे सुजय विखे म्हणाले.

दक्षिण लोकसभा मतदार संघ आजारीकोण कुठून आला याला महत्व नाही. जनतेच्या प्रश्नासंबंधी जो थेटपणे आक्रमक भूमिका घेईल. त्याचबरोबर स्व कर्तृत्वावर जनतेला दिलासा देईल याला महत्व आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघ आजारी पडला आहे. स्थानिक डॉक्टरांनी( सत्ताधारी भाजपाने) जनतेला फसवल्यामुळे जनतेने बाहेरील मेंदूचा डॉक्टर बोलवला आहे. आता ऐकेकाचे मेंदू ठिक करण्याचे काम करावे लागणार असल्याचे विखे म्हणाले.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड