शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुंभारकला वाचविण्यासाठी तरुणाची धडपड; नोकरीऐवजी घडवतोय मातीची मडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:07 IST

पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे.

खासेराव साबळे ।  पिंपळगाव माळवी : पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील एक पदवीधर तरुण कुंभारकला वाचविण्यासाठी धडपडत आहे. तो नोकरी करण्याऐवजी पारंपरिक मातीची मडकी बनविण्याचा व्यवसाय करत आहे.हिंदू संस्कृतीमध्ये विविध सण, समारंभावेळी मातीपासून बनविलेल्या विविध वस्तूंना मोठे महत्त्व आहे. त्या वस्तू पारंपरिक पद्धतीने बनविण्यात कुंभार समाजाचे मोठे योगदान आहे. सध्या या समाजातील तरुण पिढी या व्यवसायापासून दुरावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ही कला लोप पावत चालली आहे. परंतु, पिंपळगाव माळवी येथील कुंभार समाजातील पदवीधर तरुण राजू काशिनाथ काळे याने नोकरी न करता ही पारंपरिक कला जोपासण्याचा चंग बांधला आहे. राजूला त्याचे वडील काशीनाथ दगडू काळे (वय ८५) यांनी  स्वत: या कलेत पारंगत केले आहे व विविध वस्तू बनविण्याचे धडे दिले आहेत.सध्या राजू मकरसंक्रांत सणासाठी लागणारे सुगडे तयार करण्यात व्यस्त आहे. हा तरूण दीपावली, मकरसंक्रांत, अक्षयतृतीया , उन्हाळ्यातील पाण्याचे माठ, झाडांच्या कुंड्या, पणत्या, गणेश मूर्ती तयार करणारा पिंपळगाव पंचक्रोशीतील एकमेव कारागीर आहे. या मातीच्या वस्तू भाजण्यासाठी ‘आवा लावणे’ ही कलाही तो शिकला आहे. कुंड्या तयार करण्यात त्याने विशेष कौशल्य हस्तगत केले आहे.या व्यवसायास लागणारी माती, जळन, घोड्याची लिद उपलब्ध होत नाही. परंतु, त्यासाठी बरीच भटकंती करून या वस्तू जमा करव्या लागतात, असे त्यांनी सांगितले. या व्यवसायामध्ये त्याला पत्नीची मदत मिळते. यातूनच तो या व्यवसायातून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह व दोन मुलांचे शिक्षण करत आहे. ग्रामीण भागामध्ये हा पारंपरिक व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मी जाणीवपूर्वक या व्यवसायामध्ये पूर्णवेळ उतरलो. या व्यवसायातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे राजू काळे याने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSocialसामाजिकcultureसांस्कृतिक