शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

युवा शेतकऱ्याने माळरानावर शेती करून सुगंधी तेलाचे केले यशस्वी उत्पादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:20 IST

यशकथा : सुरुवातीला मुळा नदीच्या काठावरील बरड माळरान व्यापारी तत्त्वावर विकसित केली.

- हेमंत आवारी (अहमदनगर) 

शाळेत असताना ‘ऊर्ध्वपातन’ म्हणजे द्रवाचे बाष्पात आणि बाष्पाचे पुन्हा द्रवात रूपांतर ही रासायनिक प्रक्रिया मनात पक्के घर करून होतीच. या ज्ञानाच्या शिदोरीवर रसायनशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आंभोळ (ता. अकोले) येथील मच्छिंद्र चौधरी या युवकाने सुगंधी वनस्पतीची शेती ‘अ‍ॅरोमॅटिक फार्मिंग’ करण्याचा निर्णय घेतला.

अकोले तालुक्यातील आदिवासी क्षेत्रालगत मुळा नदीच्या काठावरील पठार बरड माळरानावर त्याने पारंपरिक शेती शेततळ्याच्या व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून व्यापारी तत्त्वावर विकसित केली. सात एकर शेतात जिरॅनिअम, चार एकर क्षेत्रावर ‘वाळा’ (व्हेटिव्हर) आणि काही क्षेत्रात ‘गवती चहा’ (सिड्रोल्ना) तसेच दीड एकरमध्ये ‘पालमुरजा’ (सुराड्यासारखे गवत) ची लागवड केली. चारही वनस्पतींपासून सुगंधी तेल उत्पादित होते. या वनस्पतींचा उपयोग ‘सौंदर्य प्रसाधने’ (कॉस्मॅटिक) तयार करण्यासाठी केला जात असल्याने उत्पादनास मागणी आहे. जिरॅनिअमच्या शेतात आंतरपीक म्हणून ‘शेवगा’ लागवड केली आहे.

दोन वर्षांपूर्वी २५ रुपयांप्रमाणे जिरॅनिअमची रोपे लखनौ येथून आणली. चार फुटी सरी तयार करून शेणखताच्या बेडवर सव्वा फूट अंतरावर लागवड केली. पिकांवर शेंडअळी, मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव नाही. लागवडीच्या वेळी सुपरफॉस्पेट व महाधन टाकले. नत्रासाठी गोमूत्राची फवारणी केली. सुरुवातीला एकरी एक लिटरप्रमाणे हुमीक अ‍ॅसिड व सात किलो युरिया वर खताबरोबर वापरला. पाच-सहा वेळा झिंक सल्फेट बुरशीनाशकाची फवारणी केली. साधारण एप्रिल, मेमध्ये केलेली लागवड फायदेशीर ठरते. चार महिन्यांत पीक कापणीला येते. तीन इंच फुटवा सोडून कापणी करावी. वर्षातून तीन वेळा कापणी होते. कमी पाण्यावरचे हे पीक आहे. वापसा पाहून ठिबकने पाणी दिले. एका कापणीला एकरी दहा टन उत्पादन मिळाले.

साधारण लाखभर रुपये खर्च करून शेतातच त्यांनी ‘ऊर्ध्वपातन’ प्रकल्प उभारला आहे. १ टन गवताला ३५० किलो लाकूड जळणासाठी लागते. चार रोजंदार माणसे दिवसभरात हे काम करू शकतात. १ टनाला साधारण ९०० मिली ते १ लिटर तेल मिळते. साधारणपणे साडेबारा हजार रुपये लिटर तेलास भाव आहे. वर्षात एकरी ३० लिटर तेल मिळाले. त्यातून एकरी साडेतीन लाख रुपये मिळाले असून, दीड लाख रुपये खर्च वजा जाता एकरी दोन लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे येथील कामगार प्रकाश भोर यांनी सांगितले. 

दोन वर्षात आतापर्यंत अंदाजे अडीचशे ते तीनशे लिटर तेल उत्पादन झाले आहे. आता पाच-दहा लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक बॉयलर व ऊर्ध्वपातन यंत्रणा बसविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. जिरॅनिअमच्या ४० हजार व ३० हजार अशा दोन रोपांच्या रोपवाटिका तयार केल्या असून, आठ रुपयांना एक रोप विकले जाते. शेती पाहण्यासाठी शेतकरी दररोज येतात. येत्या २६ डिसेंबरला अमरावती कृषी विद्यापीठात जाऊन मच्छिंद्र चौधरी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.