शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कामगारांचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By साहेबराव नरसाळे | Updated: March 3, 2023 17:45 IST

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माथाडी महामंडळाचे सहचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, सहसचिव बाळासाहेब वडागळे, सल्लागार अशोक बाबर, नंदू डहाणे, आशाबाई रोकडे, भैरु कोतकर, नारायण गिते, रामा पानसंबळ, रविंद्र भोसले, सतीश शेळके, मच्छिंद्र दहिफळे, विष्णू ढाकणे, किसन सानप, बबन आजबे, रत्नाबाई आजबे, लता बरेलिया, संजय महापुरे, भिमाबाई गाडे, राहिबाई गायकवाड, मंदाबाई सुर्यवंशी, आशाबाई शिंदे आदी उपस्थित होते.

 लोमटे म्हणाले, हमाल-मापाडी, स्त्री हमाल कामगार या कष्टकरी घटकांचे अनेक प्रश्न व मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे प्रलंबित आहेत. माथाडी कायदा 1969 साली अस्तित्वात आलेला आहे. हमाल कष्टकर्यांनी लढून मिळविलेला हा कायदा असंघटित कष्टकर्‍याना सामाजिक सुरक्षा देणारा देशातील पहिला कायदा आहे. काळाच्या कसोटीवरही हा कायदा आदर्श ठरला आहे.या कायद्यामुळे हमाल व माथाडी कामगारांना कामाची हमी व नियमन, भविष्य निर्वाह निधी, उपदान, विमा, आरोग्य सुविधा, बोनस इ. सुविधा आणि तंटे निवारण्यासाठी त्रि-सदस्यीय (मालक,कामगार व सरकारी अधिकारी इ.चे) मंडळ अस्तित्वात आले.

या कायद्यामुळे हमाल कष्टकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल तर झालाच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही बदलला आहे.माथाडी कायद्यांमुळे हमालांचे जीवनात आलेल्या स्थैर्‍यामुळे, शिकलेले तरुण ही या हमालीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात येवू लागले आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी जाणिवपूर्वक माथाडी कायद्याची बदनामी करीत आहेत, हे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.