शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कामगारांचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By साहेबराव नरसाळे | Updated: March 3, 2023 17:45 IST

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माथाडी महामंडळाचे सहचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, सहसचिव बाळासाहेब वडागळे, सल्लागार अशोक बाबर, नंदू डहाणे, आशाबाई रोकडे, भैरु कोतकर, नारायण गिते, रामा पानसंबळ, रविंद्र भोसले, सतीश शेळके, मच्छिंद्र दहिफळे, विष्णू ढाकणे, किसन सानप, बबन आजबे, रत्नाबाई आजबे, लता बरेलिया, संजय महापुरे, भिमाबाई गाडे, राहिबाई गायकवाड, मंदाबाई सुर्यवंशी, आशाबाई शिंदे आदी उपस्थित होते.

 लोमटे म्हणाले, हमाल-मापाडी, स्त्री हमाल कामगार या कष्टकरी घटकांचे अनेक प्रश्न व मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे प्रलंबित आहेत. माथाडी कायदा 1969 साली अस्तित्वात आलेला आहे. हमाल कष्टकर्यांनी लढून मिळविलेला हा कायदा असंघटित कष्टकर्‍याना सामाजिक सुरक्षा देणारा देशातील पहिला कायदा आहे. काळाच्या कसोटीवरही हा कायदा आदर्श ठरला आहे.या कायद्यामुळे हमाल व माथाडी कामगारांना कामाची हमी व नियमन, भविष्य निर्वाह निधी, उपदान, विमा, आरोग्य सुविधा, बोनस इ. सुविधा आणि तंटे निवारण्यासाठी त्रि-सदस्यीय (मालक,कामगार व सरकारी अधिकारी इ.चे) मंडळ अस्तित्वात आले.

या कायद्यामुळे हमाल कष्टकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल तर झालाच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही बदलला आहे.माथाडी कायद्यांमुळे हमालांचे जीवनात आलेल्या स्थैर्‍यामुळे, शिकलेले तरुण ही या हमालीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात येवू लागले आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी जाणिवपूर्वक माथाडी कायद्याची बदनामी करीत आहेत, हे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.