शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

सीईटी परीक्षेबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू; प्राजक्त तनपुरे यांचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:12 IST

राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

लोकमत संवाद

अहमदनगर : राज्यातील कोरोनाची सध्याची स्थिती पाहता पदवी परीक्षा घेणे केवळ अशक्य आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून केंद्राने, तसेच यूजीसीने आपला निर्णय बदलून या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब करावे, असे स्पष्ट करीत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षांबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. कोरोनाची स्थिती पाहून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

मंत्री तनपुरे यांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली असता, त्यांनी परीक्षांबाबत भाष्य केले. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. पदवी परीक्षा घेण्याबाबत सर्व दृष्टीने सखोल आढावा घेण्यात आला. विद्यार्थी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, विअिवध विद्यापीठांचे कुलगुरू यांच्याशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही परीक्षा न घेण्याबाबत मते मिळाली. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांमध्येही याचा उल्लेख होता की, राज्यांनी कोरोनाची स्थानिक स्थिती पाहून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालावरून, राज्य शासनाच्या संमतीने परीक्षांबाबत निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांनाही परीक्षा न घेण्याबाबत आम्ही विनंती केली. आता हा विषय न्यायालयातही गेला आहे. त्यामुळे केंद्राने किंवा यूजीसीने विद्यार्थीहिताचा, त्यांच्या आरोग्याचा विचार करता परीक्षा घेण्याचा आपला अट्टाहास सोडला पाहिजे, अशी अपेक्षा तनपुरे यांनी व्यक्त केली. 

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यात सप्टेंबरअखेरपर्यंत परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. सध्या विविध कॉलेज, संस्था कोरोना सेंटरसाठी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ते परीक्षेला येणार कसे, राहणार कोठे अशी सर्व गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर परीक्षा घेऊच शकत नाही. किती दिवस विद्यार्थ्यांच्या डोक्यावर परीक्षांची टांगती तलवार ठेवणार? सरासरी गुण, अंतर्गत मूल्यमापनावरून निकाल जाहीर करण्याचा पर्याय राज्याने दिला आहे. त्यामुळे केंद्राने यावर अंतिम निर्णय घेऊन हा गोंधळ थांबवला पाहिजे, असेही तनपुरे यांनी सूचवले. 

बारावी परीक्षांचे निकाल लागले असून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा घेण्याबाबत शासनाचे काय धोरण आहे, यावर विचारले असता, तनपुरे म्हणाले, याबाबत मागील महिन्यात सीईटी आयुक्तांशी चर्चा करून जिल्ह्यातील सीईटी सेंटर हे तालुकास्तरावर सुरू करण्याबाबत सांगितले होते. त्यावर त्यांनीहीबºयाच ठिकाणी हे सेंटर तालुकास्तरावर घेण्याची कार्यवाही केली होती, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात लॉकडाऊनची आवश्यकता नाहीजिल्ह्यात प्रारंभी कोरोनाची स्थिती आटोक्यात होती. परंतु लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रूग्णांची संख्या वाढली. त्या पार्श्वभूमीवर नुकताच जिल्हा प्रशासनाबरोबर कोरोनाचा आढावा घेतला. त्यात पुन्हा लॉकडाऊन करावे का? याबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. तालुकास्तरावरही कोरोना सेंटर सुरू असल्याने रूग्णांची व्यवस्था होत आहे, असे जिल्हाधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, असे तनपुरे म्हणाले. परंतु कोरोना सेंटरमध्ये रूग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. कोरोना चाचण्या वाढवण्याबाबत सूचना दिल्या असून काही दिवसांतच रोज ७०० ते ८०० चाचण्या होतील, असे तनपुरे यांनी सांगितले.

विद्यापीठांचा तो निर्णय चुकीचाचकाही कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांवर ‘कोविड प्रमोटेड’असा शिक्का मारला, याबाबत विचारले असता, हा प्रकार चुकीचा आहे. विद्यापीठांना असे करायला नको होते. कृषिमंत्र्यांनी त्यावर कार्यवाही केली आहे. इतर विद्यापीठांकडून असे होणार नाही, असे तनपुरे यांनी सांगितले. 

लग्न समारंभातील गर्दीवर कारवाईची सूचनालग्न समारंभासाठी मर्यादित लोकांना परवानगी असली तरी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यातूनही कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु आनंदाच्या क्षणी अशी कारवाई होण्यापेक्षा गर्दीच होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेण्याची गरज असल्याचे तनपुरे म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरेministerमंत्री