शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने

By | Updated: December 7, 2020 04:15 IST

तीसगाव : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाच्या थंडावलेल्या कामाला गती द्यावी, फुलोरबाग ते श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसह प्रत्यक्ष ...

तीसगाव : कल्याण-निर्मळ राष्ट्रीय महामार्गाच्या थंडावलेल्या कामाला गती द्यावी, फुलोरबाग ते श्रीक्षेत्र हनुमान टाकळी या ग्रामीण रस्त्याच्या दुरुस्तीसह प्रत्यक्ष लांबीनुसार मजबुतीकरण करावे, शेतीसाठी पूर्ण दाबाने व दिवसा वीज द्यावी, रोहित्र वाढवावेत, अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.८) सकाळी नऊ वाजता निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील बसस्थानकावर ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जाईल, अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख अंकुशराव चितळे, संघटक आसाराम ससे यांनी दिली.

निवडुंगे मढी परिसरात बिबट्याचा अधिक वावर आहे. जीवितहानी टाळण्यासाठी शेतीला पूर्ण दाबाने व दिवसा वीज द्यावी, मेंढवाडा, आंबेवाडी व आंधरवड वस्तीवर जास्तीचा अधिभार लक्षात घेऊन जास्त अश्वशक्तीचे रोहित्र बसवावेत, समर्थ हनुमान व कानिफनाथ देवस्थानला जोडणाऱ्या ग्रामीण सडक खड्डेरहित व वेड्याबाभळी हटवून मंजूर आकृतिबंधानुसार उर्वरित सातशे मीटर लांबीचे काम पूर्ण करावे, ठेकेदारावर यंत्रणेचा अंकुश नाही, त्यामुळे निकृष्ट व मंद गतीने कामे होत आहेत, अत्यंत वर्दळीचे रस्ते असल्याने रोजच अपघात घडत आहेत. मंगळवारी सकाळी रास्ता रोको करून विलंबाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याचे चितळे, ससे यांनी सांगितले. सुनील पालवे, भाऊसाहेब निमसे, ऋषी गव्हाणे, सागर राठोड, नवनाथ वाघ, नवनाथ उगलमुगले, बजरंग धस आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.