शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

निंबळक ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडामोर्चा

By admin | Updated: April 18, 2017 17:25 IST

नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला.

निंबळक : नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने मंगळवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. ग्रामपंचायत सदस्य मोनिका कोतकर, सुवर्णा कोतकर, सुमन मदने, सुभाष कोरडे, बी.डी. कोतकर, मुरलीधर कोतकर, साहेबराव मदने,अविनाश कोतकर,दत्तात्रय कोतकर,हरीश कळसे,संजय गायकवाड यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. मिसळ व उपसरपंच घनश्याम म्हस्के यांच्याकडे निवेदन देण्यात आले.नगर शहरापासून जवळच असलेल्या निंबळक गावात पाण्याचे तीव्र संकट ओढवले आहे. दहा ते बारा दिवसांतून एकदाच पाणी सुटत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरु करावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र तरीही पाणी वेळेवर सुटत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी गावातून फेरी काढली. पाणी वेळेवर का सुटत नाही, आम्ही पाणीपट्टी वेळेवर भरूनही अशी परिस्थिती का उद्भवते, अशा प्रश्नांचा महिलांनी ग्रामसेवक, उपसरपंच यांच्यावर भडीमार केला. पाण्याचे वितरणव्यवस्था समांतर नसल्यामुळे पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लवकरच सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन ग्रामसेवक एस.व्ही.मिसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत ३२ हातपंप असून, त्यामधील फक्त चारच हातपंपाला पाणी आहे. हातपंप ग्रामपंचायतीने दुरुस्त केले. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने पाणी येत नसल्याचे उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी सांगितले.उन्हाळ््यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. यामुळे महिलांची धावपळ होते. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्यात येईल.-मोनिका कोतकर, ग्रामपंचायत सदस्य-लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून गावाला होणारा पाणीपुरवठा कमी आहे. चार दिवसांतून एक तास पाणी सोडले जाईल. गावात जवळपास १५७१ नळजोडणी व ३३ वॉल आहेत. एका नळजोडणीला ७० ते ८० कनेक्शन असल्याने सर्वाना पाणी जात नाही. एका नळजोडणीला ३० ते ४० कनेक्शन जोडण्यात येतील. जेणेकरून सर्वाना पाणी मिळेल. - एस.व्ही.मिसाळ, ग्रामसेवक