शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

निंबळक ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडामोर्चा

By admin | Updated: April 18, 2017 17:25 IST

नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला.

निंबळक : नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने मंगळवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. ग्रामपंचायत सदस्य मोनिका कोतकर, सुवर्णा कोतकर, सुमन मदने, सुभाष कोरडे, बी.डी. कोतकर, मुरलीधर कोतकर, साहेबराव मदने,अविनाश कोतकर,दत्तात्रय कोतकर,हरीश कळसे,संजय गायकवाड यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. मिसळ व उपसरपंच घनश्याम म्हस्के यांच्याकडे निवेदन देण्यात आले.नगर शहरापासून जवळच असलेल्या निंबळक गावात पाण्याचे तीव्र संकट ओढवले आहे. दहा ते बारा दिवसांतून एकदाच पाणी सुटत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरु करावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र तरीही पाणी वेळेवर सुटत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी गावातून फेरी काढली. पाणी वेळेवर का सुटत नाही, आम्ही पाणीपट्टी वेळेवर भरूनही अशी परिस्थिती का उद्भवते, अशा प्रश्नांचा महिलांनी ग्रामसेवक, उपसरपंच यांच्यावर भडीमार केला. पाण्याचे वितरणव्यवस्था समांतर नसल्यामुळे पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लवकरच सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन ग्रामसेवक एस.व्ही.मिसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत ३२ हातपंप असून, त्यामधील फक्त चारच हातपंपाला पाणी आहे. हातपंप ग्रामपंचायतीने दुरुस्त केले. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने पाणी येत नसल्याचे उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी सांगितले.उन्हाळ््यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. यामुळे महिलांची धावपळ होते. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्यात येईल.-मोनिका कोतकर, ग्रामपंचायत सदस्य-लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून गावाला होणारा पाणीपुरवठा कमी आहे. चार दिवसांतून एक तास पाणी सोडले जाईल. गावात जवळपास १५७१ नळजोडणी व ३३ वॉल आहेत. एका नळजोडणीला ७० ते ८० कनेक्शन असल्याने सर्वाना पाणी जात नाही. एका नळजोडणीला ३० ते ४० कनेक्शन जोडण्यात येतील. जेणेकरून सर्वाना पाणी मिळेल. - एस.व्ही.मिसाळ, ग्रामसेवक