शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

निंबळक ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडामोर्चा

By admin | Updated: April 18, 2017 17:25 IST

नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला.

निंबळक : नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने मंगळवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला. ग्रामपंचायत सदस्य मोनिका कोतकर, सुवर्णा कोतकर, सुमन मदने, सुभाष कोरडे, बी.डी. कोतकर, मुरलीधर कोतकर, साहेबराव मदने,अविनाश कोतकर,दत्तात्रय कोतकर,हरीश कळसे,संजय गायकवाड यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. ग्रामविकास अधिकारी एस. व्ही. मिसळ व उपसरपंच घनश्याम म्हस्के यांच्याकडे निवेदन देण्यात आले.नगर शहरापासून जवळच असलेल्या निंबळक गावात पाण्याचे तीव्र संकट ओढवले आहे. दहा ते बारा दिवसांतून एकदाच पाणी सुटत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा सुरळीत सुरु करावा, यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन दिले होते. मात्र तरीही पाणी वेळेवर सुटत नसल्यामुळे गावातील संतप्त महिलांनी गावातून फेरी काढली. पाणी वेळेवर का सुटत नाही, आम्ही पाणीपट्टी वेळेवर भरूनही अशी परिस्थिती का उद्भवते, अशा प्रश्नांचा महिलांनी ग्रामसेवक, उपसरपंच यांच्यावर भडीमार केला. पाण्याचे वितरणव्यवस्था समांतर नसल्यामुळे पुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लवकरच सर्वांना सुरळीत पाणीपुरवठा करू, असे आश्वासन ग्रामसेवक एस.व्ही.मिसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत ३२ हातपंप असून, त्यामधील फक्त चारच हातपंपाला पाणी आहे. हातपंप ग्रामपंचायतीने दुरुस्त केले. मात्र, पाण्याची पातळी खालावल्याने पाणी येत नसल्याचे उपसरपंच घनश्याम म्हस्के यांनी सांगितले.उन्हाळ््यामुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. दहा ते बारा दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. यामुळे महिलांची धावपळ होते. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्यात येईल.-मोनिका कोतकर, ग्रामपंचायत सदस्य-लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून गावाला होणारा पाणीपुरवठा कमी आहे. चार दिवसांतून एक तास पाणी सोडले जाईल. गावात जवळपास १५७१ नळजोडणी व ३३ वॉल आहेत. एका नळजोडणीला ७० ते ८० कनेक्शन असल्याने सर्वाना पाणी जात नाही. एका नळजोडणीला ३० ते ४० कनेक्शन जोडण्यात येतील. जेणेकरून सर्वाना पाणी मिळेल. - एस.व्ही.मिसाळ, ग्रामसेवक