शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

दोन दिवसात निळवंडेतून शेतीसाठी आवर्तन सुटणार; व्हॉल्व दुरुस्तीचे काम युध्दपाळीवर, पाटबंधारे विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:50 IST

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

अकोले : निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

‘गर्दणी-बहिरवाडी-उंचखडक खर्द-टाळळी-ढोकरी-तांभोळ परिसरातील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून पाणी सोडले नाही तर धरणाचे गेट बंद आंदोलन छेडू असा इशारा शेतक-यांनी दिला’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रकाशित होताच लघु पाटबंधारे विभागाने वरील निर्वाळा दिला आहे. आमदार डॉ.किरण लहामटे यांनी बातमीची दखल घेत व्हॉल्व बसविण्याच्या कामात दिरंगाई नको, अशा सूचना लघुपाटबंधारे विभागाला देत आपण आवर्तनाबाबत शेतक-यांच्या मागणी सोबत आहोत, असे स्पष्ट केले. पाण्याच्या आडून राजकारण खपवून घेतले जाणार नाही. निळवंडे उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार असून याची सूचना १७ तारखेलाच दिली गेली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी सोडणे शक्य झाले नाही. याची खात्री न करता काही राजकीय मंडळींनी याचे राजकारण सुरु केले ही खेदजनक बाब आहे. २५ मार्चला हे आवर्तन सोडले जाणार आहे. शेतकरी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही व पाण्याचा अपव्यय टाळून पुढे पाणी पिण्यासाठी आवर्तन राखून ठेवले जाणार आहे, असे लहामटे यांनी सांगितले. आढळा विभागातील शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन २५ मार्चला पाडोशी धरणातून तर २६ मार्चला सांगवी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. यामुळे केळीसांगवी, टाहाकारी, समशेरपूर, सावरगावपाट भागातील शेतीला दिलासा मिळणार आहे. मुळा खो-यात ‘आंबीत ते आभाळवाडी’ लाभक्षेत्रात पाणी सोडले गेले असून बलठण, कोथळा तलावांमधून स्थानिक शेतक-यांना पाणी दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

उच्चस्तरीय कालव्याच्या ‘उजवा-डावा’ शाखा एकाच ठिकाणाहून विभागल्या जातात. उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसण्याचे काम सुरु आहे. कोरोनामुळे कामगारांना सक्ती करता येत नाही. मंगळवार-बुधवार व्हॉल्व चे काम पूर्ण होणे अपेक्षित असून काम पूर्ण होताच डाव्या कालव्यास पाणी सोडले जाईल. - हरुन तांबोळी, उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, निळवंडे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरakole-acअकोलेDamधरणWaterपाणी