शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

दोन दिवसात निळवंडेतून शेतीसाठी आवर्तन सुटणार; व्हॉल्व दुरुस्तीचे काम युध्दपाळीवर, पाटबंधारे विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:50 IST

निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

अकोले : निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसवण्याचे काम कोरोनाच्या सावटामुळे लांबले आहे. व्हॉल्वच्या वेल्डींगचे काम पूर्ण होताच २५ किंवा २६ मार्चला उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन पाणी सोडण्यात येईल, अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.

‘गर्दणी-बहिरवाडी-उंचखडक खर्द-टाळळी-ढोकरी-तांभोळ परिसरातील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून पाणी सोडले नाही तर धरणाचे गेट बंद आंदोलन छेडू असा इशारा शेतक-यांनी दिला’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रकाशित होताच लघु पाटबंधारे विभागाने वरील निर्वाळा दिला आहे. आमदार डॉ.किरण लहामटे यांनी बातमीची दखल घेत व्हॉल्व बसविण्याच्या कामात दिरंगाई नको, अशा सूचना लघुपाटबंधारे विभागाला देत आपण आवर्तनाबाबत शेतक-यांच्या मागणी सोबत आहोत, असे स्पष्ट केले. पाण्याच्या आडून राजकारण खपवून घेतले जाणार नाही. निळवंडे उच्चस्तरीय डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार असून याची सूचना १७ तारखेलाच दिली गेली होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी सोडणे शक्य झाले नाही. याची खात्री न करता काही राजकीय मंडळींनी याचे राजकारण सुरु केले ही खेदजनक बाब आहे. २५ मार्चला हे आवर्तन सोडले जाणार आहे. शेतकरी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही व पाण्याचा अपव्यय टाळून पुढे पाणी पिण्यासाठी आवर्तन राखून ठेवले जाणार आहे, असे लहामटे यांनी सांगितले. आढळा विभागातील शेतक-यांची मागणी लक्षात घेऊन २५ मार्चला पाडोशी धरणातून तर २६ मार्चला सांगवी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. यामुळे केळीसांगवी, टाहाकारी, समशेरपूर, सावरगावपाट भागातील शेतीला दिलासा मिळणार आहे. मुळा खो-यात ‘आंबीत ते आभाळवाडी’ लाभक्षेत्रात पाणी सोडले गेले असून बलठण, कोथळा तलावांमधून स्थानिक शेतक-यांना पाणी दिले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

उच्चस्तरीय कालव्याच्या ‘उजवा-डावा’ शाखा एकाच ठिकाणाहून विभागल्या जातात. उजव्या कालव्याचे व्हॉल्व बसण्याचे काम सुरु आहे. कोरोनामुळे कामगारांना सक्ती करता येत नाही. मंगळवार-बुधवार व्हॉल्व चे काम पूर्ण होणे अपेक्षित असून काम पूर्ण होताच डाव्या कालव्यास पाणी सोडले जाईल. - हरुन तांबोळी, उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, निळवंडे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरakole-acअकोलेDamधरणWaterपाणी