शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विखे पॅटर्न अजून संपलेला नाही-सुजय विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 12:11 IST

एक-दोन निवडणुकीत आम्हाला अपयश आले असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात येणाºया निवडणुकांत जिल्ह्यातील विखे पॅटर्न दाखवून देऊ, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला.

अहमदनगर : एक-दोन निवडणुकीत आम्हाला अपयश आले असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात येणा-या निवडणुकांत जिल्ह्यातील विखे पॅटर्न दाखवून देऊ, असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे गुरूवारी विखे यांच्या नेतृत्वाखाली विविध आढावा बैठका झाल्या. त्यानंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडे संख्याबळ नव्हते. राष्ट्रवादी-कॉँग्रेसनेही आमच्याशी संपर्क करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व गोष्टी विचारात घेता तेथे आम्ही माघार घेतली, अशी प्रांजळ कबुली विखे यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी शालिनीताई विखे या काँग्रेसमध्येच आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्या काँग्रेसच्या सदस्यांमध्येच बसल्या होत्या, असे स्पष्टीकरण दिले. गेल्या काही दिवसांतील निवडणुकांत जिल्ह्यात आम्हाला फटका बसला असेल म्हणून विखे पॅटर्न संपला असे नाही. भविष्यात हा पॅटर्न नक्की दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगरzpजिल्हा परिषदSujay Vikheसुजय विखे