शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘त्या’ नऊ मजुरांना निवारा देता का निवारा ?; पोलिसांची नगर महापालिकेकडे याचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 20:49 IST

ठाण्याहून वाशिमला परतणाऱ्या नऊ मजुरांना पोलिसांनी नगर शहरात रोखले खरे, पण त्यांच्या निवा-याची व्यवस्थाच होत नसल्याने हे मजूर चक्क पोलीस स्टेशनमध्येच बसून आहेत. रविवारची रात्र त्यांनी चक्क पोलीस व्हॅनमध्ये काढली.

अहमदनगर: ठाण्याहून वाशिमला परतणाऱ्या नऊ मजुरांना पोलिसांनी नगर शहरात रोखले खरे, पण त्यांच्या निवा-याची व्यवस्थाच होत नसल्याने हे मजूर चक्क पोलीस स्टेशनमध्येच बसून आहेत. रविवारची रात्र त्यांनी चक्क पोलीस व्हॅनमध्ये काढली.वाशिमचे हे मजूर ठाण्याहून गावाकडे पायी निघाले होते. त्यामध्ये पाच पुरुष व चार महिला आहेत. रविवारी नगर शहरात सकाळी सात वाजता त्यांना पोलिसांनी अडविले. त्यानंतर त्यांना तोफखाना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी मजुरांची जिल्हा रुग्णालयात नेऊन तपासणी केली. रुग्णालयाने त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारले असून त्यांना नगर शहरातच क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे.त्यामुळे तोफखाना पोलीस मजुरांना घेऊन महापालिकेत गेले. मात्र महापालिका त्यांची व्यवस्था करायला तयार नाही. त्यामुळे हे मजूर रविवारी दिवसभर व रात्रभर पोलीस स्टेशनला बसून होते. बराच काळ त्यांनी पोलीस व्हॅनमध्येच काढला. सोमवारीही तोफखाना पोलीस महापालिका आयुक्तांकडे गेले. मात्र, आम्ही या मजुरांची सोय करु शकत नाही. या मजुरांना तुम्ही जेथे ताब्यात घेतले तेथे सोडून द्या, असे उत्तर महापालिका आयुक्तांनी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.मजुरांची ते सापडतील तेथे सोय करा अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. त्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला निधी दिला आहे. नगर महापालिकेचे अधिकारी मात्र नऊ मजुरांची सोय करायला तयार नाहीत. रविवारी सकाळी ताब्यात घेतलेल्या या मजुरांना नगर महापालिका सोमवारी रात्रीपर्यंत निवारा देऊ शकलेली नाही.

आत्तापर्यंत नगर महापालिकेने चारशे मजुरांची व्यवस्था केली आहे. मात्र, अजूनही मजूर येत आहेत. त्यामुळे व्यवस्था करायची कोठे ? हा प्रश्न आहे. आम्हाला जिल्हा पुरवठा विभागाकडून साधे धान्यही मिळालेले नाही. आहे त्या मजुरांना सांभाळण्याची लाखो रुपयांची बिले संस्थांनी आमच्याकडे पाठवली आहेत. हे पैसे द्यायचे कसे? हा प्रश्न आहे.- श्रीकांत मायकलवार, आयुक्त महापालिका, अहमदनगर

लॉकडाऊन तोडून शहरातून जात असताना नऊ मजूर पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांना ताब्यात घेतले. या मजुरांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्यात आली असून त्यांना क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या मजुरांना निवारा कक्षात तत्काळ दाखल करणे गरजेचे आहे. या संदर्भात गेल्या दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनाशी वारंवार संपर्क करूनही या मजुरांना दाखल करून घेतले जात नाही. आता या मजुरांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.-हारुण मुलाणी, पोलीस निरीक्षक, तोफखाना पोलीस स्टेशन

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस