शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील शेतक-यांना का मिळाली नाही कर्जमाफी : वाचा सविस्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 19:05 IST

थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे.

अहमदनगर : शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने मोठा गाजावाजा करीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे.सरकारने बँकांना कर्जदार शेतक-यांची नावांची यादी पाठविली. बँकांच्या खात्यात पैसेही वर्ग केले आहेत. मात्र, ते कर्ज संबंधित शेतक-यांच्या कोणत्या बँकेच्या, कोणत्या सोसायटीच्या नावे भरायचे आहे, याचाच तपशील सरकारने बँकांना कळविलेला नाही. त्यामुळे बँकांकडून हे पैसे संबंधित शेतक-याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरचा बोजा कायम आहे. कर्जमाफी योजना लागू होऊनही शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.सरकारने बँकांकडे पाठविलेल्या यादीत फक्त संबंधित शेतक-याचे नाव आणि त्याच्या गावाचे नाव आहे. मात्र, संबंधित शेतक-याचे कर्ज कोणत्या बँकेचे आहे, ते किती आहे व त्यापैकी किती कर्ज माफ करायचे आहे, असा कोणताच तपशील सरकारने बँकांना कळविलेला नाही.एकाच शेतक-याची इतर जिल्ह्यात जमिन असेल आणि तो तेथील स्थानिक सोसायटीचा किंवा बँकेचा थकबाकीदार असेल तर त्याचेही कर्ज माफ करायचे किंवा नाही, याबाबतही बँकांना निर्देश देण्यात आलेले नाहीत.सरकारने कर्जमाफी योजना लागू करताना जुलैअखेरची कर्जाची रक्कम गृहीत धरुन शेतक-यांची या योजनेत निवड केली आहे. मात्र, जुलैनंतरचे जे व्याज झाले आहे ते कोणी भरायचे?, उर्वरित व्याजाची जबाबदारी सरकार घेणार का किंवा संबंधित शेतक-याकडून वसूल करायचे आहे, याबाबतही सरकारकडून बँकांना काहीही निर्देश देण्यात आलेले नाहीत. नगर जिल्हा बँकेने सरकारच्या या अस्पष्टतेबाबत सहकार आयुक्तांना बारा मुद्यांचे पत्र लिहिले आहे. अद्याप बँकेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सहकार आयुक्तांकडून मिळालेली नाहीत. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळालेला नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस