शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

नगरमधील शेतक-यांना का मिळाली नाही कर्जमाफी : वाचा सविस्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 19:05 IST

थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे.

अहमदनगर : शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने मोठा गाजावाजा करीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे.सरकारने बँकांना कर्जदार शेतक-यांची नावांची यादी पाठविली. बँकांच्या खात्यात पैसेही वर्ग केले आहेत. मात्र, ते कर्ज संबंधित शेतक-यांच्या कोणत्या बँकेच्या, कोणत्या सोसायटीच्या नावे भरायचे आहे, याचाच तपशील सरकारने बँकांना कळविलेला नाही. त्यामुळे बँकांकडून हे पैसे संबंधित शेतक-याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरचा बोजा कायम आहे. कर्जमाफी योजना लागू होऊनही शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.सरकारने बँकांकडे पाठविलेल्या यादीत फक्त संबंधित शेतक-याचे नाव आणि त्याच्या गावाचे नाव आहे. मात्र, संबंधित शेतक-याचे कर्ज कोणत्या बँकेचे आहे, ते किती आहे व त्यापैकी किती कर्ज माफ करायचे आहे, असा कोणताच तपशील सरकारने बँकांना कळविलेला नाही.एकाच शेतक-याची इतर जिल्ह्यात जमिन असेल आणि तो तेथील स्थानिक सोसायटीचा किंवा बँकेचा थकबाकीदार असेल तर त्याचेही कर्ज माफ करायचे किंवा नाही, याबाबतही बँकांना निर्देश देण्यात आलेले नाहीत.सरकारने कर्जमाफी योजना लागू करताना जुलैअखेरची कर्जाची रक्कम गृहीत धरुन शेतक-यांची या योजनेत निवड केली आहे. मात्र, जुलैनंतरचे जे व्याज झाले आहे ते कोणी भरायचे?, उर्वरित व्याजाची जबाबदारी सरकार घेणार का किंवा संबंधित शेतक-याकडून वसूल करायचे आहे, याबाबतही सरकारकडून बँकांना काहीही निर्देश देण्यात आलेले नाहीत. नगर जिल्हा बँकेने सरकारच्या या अस्पष्टतेबाबत सहकार आयुक्तांना बारा मुद्यांचे पत्र लिहिले आहे. अद्याप बँकेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सहकार आयुक्तांकडून मिळालेली नाहीत. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळालेला नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरीGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस