शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींचे नाव घेणाऱ्या मिशेलमामाचा बोलविता धनी कोण?- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 21:14 IST

 सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. 

अहमदनगर : देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी नगर येथे केली.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांना संपविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ही भूमिका यापूर्वी कधीही स्वीकारली गेलेली नाही. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना अडचणीत आणण्याची भाषा करीत आहेत. संरक्षण विभागातील गैरव्यवहाराचे पुरावे देणाऱ्यांना धरून आणले जाईल. परदेशात जो एजंट आहे, त्याला आणत आहोत. त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. आम्ही ती लवकरच जाहीर करणार असून, विरोधकांना आम्ही धडा शिकवणार आहोत, असे पंतप्रधान भाषणातून सांगत आहेत. मी ते करून दाखविणारच माझे नाव मोदी आहे, असे ते सांगत आहेत. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर गैरव्यवहारात परदेशातील मिशेल मामा आता भारतात आला आहे. त्याची चौकशी होईल. गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान जे सांगत होते, मिशेलमामा आता काय बोलणार ते बघाच. या प्रकरणात काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे नाव मिशेलने घेतल्याचे ईडीने सांगितले आहे. म्हणजेच सत्तेचा एवढा मोठा गैरवापर केला जात आहे. त्याचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हे देशावरील मोठे संकट असून, यासंदर्भात संसदेच्या येणा-या अधिवेशनात सर्व विरोधकांना एकत्र करून आवाज उठविणार असल्याचे पवार म्हणाले़ सरकारने आरबीआय, न्यायव्यवस्था आणि सीबीआय या सर्व संस्थांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे देशाची आणिबाणी धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले.शेतकरी कर्जमाफीची पंतप्रधानांकडून थट्टातीन राज्यांतील सरकारांनी शेतक-यांना कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या राज्यांना अर्थिक मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेणे अपेक्षित आहे. मात्र देशांच्या पंतप्रधानांनी या कर्जमाफीची लॉलीपॉप, असे म्हणून एक प्रकारे थट्टा केली आहे. शेतक-यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना देशाच्या पंतप्रधानांनी कर्जमाफीबाबत, असे विधान करणे योग्य नाही़, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार