शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सोनिया गांधींचे नाव घेणाऱ्या मिशेलमामाचा बोलविता धनी कोण?- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 21:14 IST

 सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. 

अहमदनगर : देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी नगर येथे केली.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांना संपविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ही भूमिका यापूर्वी कधीही स्वीकारली गेलेली नाही. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना अडचणीत आणण्याची भाषा करीत आहेत. संरक्षण विभागातील गैरव्यवहाराचे पुरावे देणाऱ्यांना धरून आणले जाईल. परदेशात जो एजंट आहे, त्याला आणत आहोत. त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. आम्ही ती लवकरच जाहीर करणार असून, विरोधकांना आम्ही धडा शिकवणार आहोत, असे पंतप्रधान भाषणातून सांगत आहेत. मी ते करून दाखविणारच माझे नाव मोदी आहे, असे ते सांगत आहेत. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर गैरव्यवहारात परदेशातील मिशेल मामा आता भारतात आला आहे. त्याची चौकशी होईल. गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान जे सांगत होते, मिशेलमामा आता काय बोलणार ते बघाच. या प्रकरणात काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे नाव मिशेलने घेतल्याचे ईडीने सांगितले आहे. म्हणजेच सत्तेचा एवढा मोठा गैरवापर केला जात आहे. त्याचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हे देशावरील मोठे संकट असून, यासंदर्भात संसदेच्या येणा-या अधिवेशनात सर्व विरोधकांना एकत्र करून आवाज उठविणार असल्याचे पवार म्हणाले़ सरकारने आरबीआय, न्यायव्यवस्था आणि सीबीआय या सर्व संस्थांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे देशाची आणिबाणी धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले.शेतकरी कर्जमाफीची पंतप्रधानांकडून थट्टातीन राज्यांतील सरकारांनी शेतक-यांना कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या राज्यांना अर्थिक मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेणे अपेक्षित आहे. मात्र देशांच्या पंतप्रधानांनी या कर्जमाफीची लॉलीपॉप, असे म्हणून एक प्रकारे थट्टा केली आहे. शेतक-यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना देशाच्या पंतप्रधानांनी कर्जमाफीबाबत, असे विधान करणे योग्य नाही़, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार