शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाचवीत असताना मी सातवीच्या वर्गाला गणित शिकवलं; आठरे, कुलकर्णी गुरूजींनी दिला विश्वास; माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 11:46 IST

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांनी दिलेले धडे कामी आले. त्यामुळेच खेडेगावातील एका मराठी शाळेतील विद्यार्थी दोन-दोन विद्यापीठांचा कुलगुरू होऊ शकला, अशा शब्दांत शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी  शिक्षकांचा गौरव केला.

शिक्षक दिन विशेष

चंद्रकांत शेळके । 

अहमदनगर : नगर तालुक्यातील मांडवे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण झालं. शाळेला इमारत  नव्हती. पत्रे  उडालेले. अशा स्थितीत आठरे गुरूजी व कुलकर्णी गुरूजी हे दोघेच सातवीपर्यंत शिकवत होते. दोघा शिक्षकांनी शिकवलेलं गणित  पुढे आयुष्यभर कामी आलं. त्या शिक्षकांमुळे एवढा आत्मविश्वास वाढला की मी पाचवीत असतानाच सहावी व सातवीतील मुलांना गणित शिकवत होतो. हीच शिदोरी घेऊन आयुष्यात गणिताचा प्राध्यापक, कुलगुरू व इतर पदे मिळवता आली. 

अभियांत्रिकीऐवजी गणितच निवडलेपुढे दहावी कोपरगावला केली. तेथे आर. जी. कोºहाळकर या शिक्षकांमुळे गणित आणखी वृद्धिंगत झाले. अकरावी पुन्हा नगरमध्ये दादा चौधरी विद्यालयात झाली. तेथे स. वि. हातवळणे सरांनी घडवले. सन १९६७ ते ७१ मध्ये नगर कॉलेजमधून बीएस्सी पूर्ण केले. खरं तर त्यावेळी अभियांत्रिकीला जाण्याची मोठी संधी होती. परंतु गणितात ंरूची असल्याने पुढे पुणे विद्यापीठात एमएस्सी (गणित) पूर्ण केले. पुणे विद्यापीठात राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षकांचा सहवास लाभला. त्यावेळी पुणे विद्यापीठात जगभरातून शिक्षकांना मागणी होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिक्षणही जवळून पाहता आले. 

प्राध्यापक ते कुलगुरूपदवीनंतर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेत १९७५ ला गणिताचा प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. २००४मध्ये तेथेच प्राचार्यपदाची संधी मिळाली. या काळात अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले. दरम्यानच्या काळात पुणे विद्यापीठातील सर्वच अधिकार मंडळावर काम केले. या सर्वांचा परिणाम २००८-१३ स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ व २०१३-१६ मध्ये लखनौ विद्यापीठात कुलगुरूपदाची संधी मिळाली. 

गावातून येऊन शहरी शाळेत नंबर...सातवीपर्यंत मांडवे गावात शिक्षण झाल्यानंतर आठवीला नगरमधील न्यू इंग्लिश स्कूलला प्रवेश घेतला. आम्हाला सातवीपर्यंत इंग्रजी नव्हतं. परंतु न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवीपासूनच इंग्रजी असल्याने तेथील मुलांना इंग्रजीची ओळख होती. मला आठवीत एबीसीडीही माहीत नव्हती. परंतु तरीही माझ्या आधीच्या शिक्षकांचे मार्गदर्शन व स्वअध्ययनामुळे आठवीत मी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला. त्यातून मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. 

जीवनाला दिशा देण्यात व आपली जडणघडण करण्यात गुरूंचा वाटा महत्वाचा असतो. जगात शिक्षकांना व त्यातही भारतीय प्राध्यापकांना मानाचे स्थान आहे.     - डॉ़ सर्जेराव निमसे, माजी कुलगुरू.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र