शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गव्हाची पेरणी, ऊस लागवड रखडली

By admin | Updated: December 18, 2015 23:15 IST

अहमदनगर : पाटपाण्याच्या अभावामुळे जिल्ह्यात गव्हाची पेरणी आणि उसाच्या लागवडीचे प्रमाण चिंताजनक बनले आहे.

अहमदनगर : पाटपाण्याच्या अभावामुळे जिल्ह्यात गव्हाची पेरणी आणि उसाच्या लागवडीचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. चारा पिकाची स्थिती बरी असून कांदा पिकाचे क्षेत्र गत आठवड्याच्या तुलनेत दहा हजार हेक्टरने वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या ९ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली असून जवळपास उसाच्या लागवडी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. खरिपापाठोपाठ जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतीचे चित्र विदारक बनले आहे. ज्वारी, चारा पिके आणि कांदा वगळता अन्य सर्वच पिकांची पेरणी स्थिती चिंताजनक आहे. हरभरा पिकाचे क्षेत्र ६० टक्के असले तरी पिकाला आवश्यक असणारे पाणी आणि पिकावरील किडीमुळे हे पीक शेतकऱ्यांच्या किती टक्के पदरी पडणार हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. सध्या संमिश्र हवामान आहे. कधी ढग येतात आणि जातात. तर कधी थंडी असते. यामुळे शेतात उभ्या असणाऱ्या पिकांचे आरोग्य धोक्यात आहे. दक्षिण जिल्ह्यात ज्वारी पीक जोमात आहे. हे पीक सध्या हुरडा अवस्थेत असून काही ठिकाणी पाण्याअभावी ज्वारी करपण्यास सुरूवात झाली आहे. ६४ टक्के हेक्टरवर रब्बी मका पिकाची पेरणी झालेली असून काही ठिकाणी पेरणीचे काम वेगात आहे. करडई पिकाची १७ टक्के क्षेत्रावर, तीळ पिकाची १२ टक्के क्षेत्रावर, जवस पिकाचे ६ टक्के क्षेत्रावर आणि सुर्यफूल पिकाची ६ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कांदा पिकाचे क्षेत्र ८२ हजार ८४२ हेक्टरपर्यंत पोहचले असून यात आणखीन वाढ होणार आहे. ऊस पिकाचे क्षेत्र गत आठवड्यात जेवढे होते, तेवढेच आहे. २५ हजार ५८२ हेक्टरच्या पुढे ऊस क्षेत्र सरकरलेले नाही. यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामाचा विषय चिंतेचा राहणार आहे. यंदा चारा पिकाचे क्षेत्र ५५ हजार हेक्टर असल्याने जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने हे आशादायक चित्र राहणार आहे. (प्रतिनिधी)