शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक ...

अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक जीवनातील हा टप्पा महत्त्वाचा असून ही परीक्षा हवीच, असे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. मात्र कोरोनामुळे परीक्षा झाली नाही तर अन्य पर्याय काय याबाबत गोंधळ सुरू आहे. पूर्ण वेळ किंवा पूर्ण गुणांची परीक्षा झाली नाही तरी वेळ कमी करून, अभ्यासक्रम कमी करून का होईना परंतु परीक्षा व्हावी असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीची परीक्षा पुढील शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाची असल्याने ऑनलाईन का होईना परंतु परीक्षा झाली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. बारावीचा अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेत कपात करून परीक्षा घ्यावी, असे काहींचे म्हणणे आहे. सर्व विषयांची एकच प्रश्नपत्रिका आणि तीही बहुपर्यायी स्वरूपात तयार करून केवळ एकच दिवसात ऑनलाईन परीक्षा घेऊन मूल्यांकन होऊ शकते, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकंदरीत बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये गोंधळ आहे. अंतिमत: शासन काय निर्णय घेते, यावरच आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे.

------------

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - ६४१२४

शाळा - ४५०

-----------

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात बारावीचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे परीक्षा होणे गरजेचे आहे. ऑफलाईन शक्य नसेल तर ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. यात शाखानिहाय सर्व विषयांची एकच एमसीक्यू पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करून एकाच दिवशी पेपर घ्यावा. त्यावर गुणपत्रिका तयार करता येईल.

- डॉ. प्रा. दत्तात्रय घुंघार्डे, न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेर

-------------

कोणत्याही परिस्थितीत बारावीची परीक्षा व्हावी. ऑफलाईन परीक्षा शक्य नसेल तर ऑनलाईन का होईना परीक्षा घ्यावी. त्यात अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेतही कपात करून परीक्षा शक्य आहे.

- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना

-------------

वर्षभरापासून आम्ही बारावीचा अभ्यास करत आहोत. आता परीक्षा रद्द झाली तर खूप मोठे नुकसान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा महत्वाची आहेच परंतु करिअरच्या दृष्टीने ऑनलाईन का होईना परीक्षा झाली पाहिजे.

- पवन पवार, विद्यार्थी

--------------

सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परीक्षा घेता आली नाही तरी कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षा घ्यावी. पुढील करिअरच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षा रद्द हा पर्याय होऊ शकत नाही.

- अक्षय साबळे, विद्यार्थी