शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक ...

अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक जीवनातील हा टप्पा महत्त्वाचा असून ही परीक्षा हवीच, असे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. मात्र कोरोनामुळे परीक्षा झाली नाही तर अन्य पर्याय काय याबाबत गोंधळ सुरू आहे. पूर्ण वेळ किंवा पूर्ण गुणांची परीक्षा झाली नाही तरी वेळ कमी करून, अभ्यासक्रम कमी करून का होईना परंतु परीक्षा व्हावी असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीची परीक्षा पुढील शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाची असल्याने ऑनलाईन का होईना परंतु परीक्षा झाली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. बारावीचा अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेत कपात करून परीक्षा घ्यावी, असे काहींचे म्हणणे आहे. सर्व विषयांची एकच प्रश्नपत्रिका आणि तीही बहुपर्यायी स्वरूपात तयार करून केवळ एकच दिवसात ऑनलाईन परीक्षा घेऊन मूल्यांकन होऊ शकते, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकंदरीत बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये गोंधळ आहे. अंतिमत: शासन काय निर्णय घेते, यावरच आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे.

------------

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - ६४१२४

शाळा - ४५०

-----------

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात बारावीचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे परीक्षा होणे गरजेचे आहे. ऑफलाईन शक्य नसेल तर ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. यात शाखानिहाय सर्व विषयांची एकच एमसीक्यू पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करून एकाच दिवशी पेपर घ्यावा. त्यावर गुणपत्रिका तयार करता येईल.

- डॉ. प्रा. दत्तात्रय घुंघार्डे, न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेर

-------------

कोणत्याही परिस्थितीत बारावीची परीक्षा व्हावी. ऑफलाईन परीक्षा शक्य नसेल तर ऑनलाईन का होईना परीक्षा घ्यावी. त्यात अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेतही कपात करून परीक्षा शक्य आहे.

- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना

-------------

वर्षभरापासून आम्ही बारावीचा अभ्यास करत आहोत. आता परीक्षा रद्द झाली तर खूप मोठे नुकसान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा महत्वाची आहेच परंतु करिअरच्या दृष्टीने ऑनलाईन का होईना परीक्षा झाली पाहिजे.

- पवन पवार, विद्यार्थी

--------------

सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परीक्षा घेता आली नाही तरी कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षा घ्यावी. पुढील करिअरच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षा रद्द हा पर्याय होऊ शकत नाही.

- अक्षय साबळे, विद्यार्थी