शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पेरायचं काय अन् खायचं काय?

By admin | Updated: August 2, 2014 00:40 IST

अकोले: ‘पराडाची माती वरुन घसरुन येताय, मंग तुंबारा बसून चर फुटला, समदं वावर वाहून गेलं. पाच-सहा पायलीचा राब होता, समदा पाण्यात गेला.

अकोले: ‘पराडाची माती वरुन घसरुन येताय, मंग तुंबारा बसून चर फुटला, समदं वावर वाहून गेलं. पाच-सहा पायलीचा राब होता, समदा पाण्यात गेला. आवणीची वावरं मातीमैलान भरुन गेल्यात, आता पेरायचं काय अन् खायाच काय?’, अशी कैफीयत एकदरा येथील आदिवासी शेतकरी तुकाराम धोंडू भांगरे, पार्वताबाई भांगरे, चांगुनाबाई भांगरे मांडली. या नुकसानीची दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न त्यांना सतावतोय़बित्तमगड परिसरात महाकाय डोंगराच्या पायथ्याला वनक्षेत्रात चर खोदून पाणी आढळा खोऱ्यात आणण्याचा प्रकल्प सुरु आहे. आदिवासी विभागाच्या सहकार्याने वनविभागाने वनक्षेत्र ग्रामपंचायतीला हस्तांतरित केले असून, वनसमितीच्यावतीने काम सुरु आहे. चार सिमेंट बांध घालण्यात आले असून वन जमिनीत वृक्ष तोड झाली आहे. मात्र काही ठिकाणी मातीच्या चरावर नुकतेच बांबूची रोपे लावण्यात आली आहेत. केतकी, खराळाचा व वांजरघोटी ओहळ असे तीन ओढ्याचे पाणी एकत्र केले असून दीड किलोमीटरच्या चर कालव्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काम अपुरे झाले असून तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने चर काही ठिकाणी फुटला तर काही शेतांचे नुकसान झाल्याने पाणी वळवण्यात आले आहे.या पाण्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान झाले असून काही रोपे वाहून गेली. काही शेतात गुडघ्या इतकी माती साचल्याने शेती दिसेनाशी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटले आहे. शेतीच्या नुकसानीमुळे शेतकरी गांगरुन गेला आहे. वन जमिनीत चर खोदल्याने भविष्यात ‘माळीण’ गावासारखे येथेही जमिनीचे भूस्खलन होण्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. काळू धोंडू भांगरे, नाथु सखाराम भांगरे, वाळीबा भांगरे आदींच्या जमिनीचे व भात रोपांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भाजपाचे जालिंदर वाकचौरे व सेनेचे डॉ. शरद तळपाडे यांनी केली आहे.बिताका गावाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून, चिखलात गावकरी वाट धुंडाळताना दिसतात. रस्ता नावालाच शिल्लक राहिला आहे. चरामुळे झाडी नष्ट झाली असून येथे वृक्ष लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. दीड किलोमीटर लांब व ६५० ते ७०० फूट उंच अशा चौरसक्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचे पाणी चरातून धरणक्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न आहे़ अधिक पावसामुळे शेतीची हानी होईल असे पाचघरवाडी, एकदरा, जायनावाडी, बिताका येथील गावकरी सांगतात. पर्यावरण पूरक काम नाही. मोठी रक्कम खर्च होऊन झुळझुळ पाणी वाहत आहे. आढळा लाभक्षेत्राला चराचा अपेक्षित फायदा दिसत नाही.-जालिंदर वाकचौरे, शेतकरीएकदरा, जायनावाडी भागात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़-रुपेश सुराणा, नायब तहसीलदारवनहद्दीत काम झाले असले तरी वनविभागाचा संबंध येत नाही. जमीन गावाकडे वर्ग केली असून वनसमिती व गावकरी यांच्यामार्फत काम सुरु आहे़-शिवाजी फटांगरे, उपविभागीय वन अधिकारी