शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सर्वसामान्यांना पोलिसांकडून न्याय मिळेल असे काम करू; नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:53 IST

अहमदनगर : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

अहमदनगर : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

पाटील हे सोलापूर येथून नगरला बदलून आले आहेत. त्यांनी गुरुवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या बावीस वर्षांच्या सेवेत आपण सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, भिवंडी अशा शहरांमध्ये काम केले आहे. नगरबाबत आपण ऐकून होतो परंतु या जिल्ह्यात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

राज्यात सर्वाधिक मोठा जिल्हा असल्याने येथे काम करण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कामगिरी व जबाबदाºया पार पाडणे, तसेच पोलीस कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे अशा काही गोष्टींना आपण प्राथमिकता देणार आहे. 

नगर जिल्ह्यात यापूर्वीच्या अधिकाºयांनी केलेले काम पुढे नेणे, अधिकाधिक गुन्ह्यांची उकल कशी करता येईल यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्यात पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूच परंतु आहे त्या पोलिसांची कार्यक्षमता वाढवून तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी काम कसे करता येईल याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस