शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शूरा आम्ही वंदिले! : देश रक्षणासाठी दिले जिवाचे दान, भाऊसाहेब तळेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:12 IST

एकुलते एक असलेले भाऊसाहेब मारूती तळेकर यांनीलहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले. दुसऱ्याचे कपडे घालून कोळगावातील कोळाईदेवी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

ठळक मुद्देशिपाई भाऊसाहेब मारूती तळेकरजन्मतारीख १ जून १९७८सैन्यभरती १९ फेब्रुवारी १९९७वीरगती २ मार्च २०००वीरमाता सीताबाई मारूती तळेकर

एकुलते एक असलेले भाऊसाहेब मारूती तळेकर यांनीलहानपणापासूनच गरिबीचे चटके सोसले. दुसऱ्याचे कपडे घालून कोळगावातील कोळाईदेवी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मनात देशसेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपोआपच भाऊसाहेब यांची पावले सैन्यदलाकडे वळाली. भरतीसाठी बेळगाव गाठले. १९ फेब्रुवारी १९९७ रोजी सैन्यदलात भरती झाले. कारगील युद्धातील रक्षक आॅपरेशनमध्ये देशासाठी स्वत:ला वाहून घेतले़न्याची भूमी असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमधील मारुती व सीताबाई तळेकर यांना चार मुली तर भाऊसाहेब हे एकुलते एक पुत्र. चार मुलींनंतर १ जून १९७८ रोजी तळेकर यांच्या घरात पुत्ररत्न झाले. वडिलांनी गावात रोजंदारी केली तर आई सीताबाई यांनी शेतावर मोलमजुरी करून मुलांना शिकविण्यासाठी कष्ट उपसले. भाऊसाहेब हे शाळेत हुशार पण आई वडिलांचे कष्ट पाहून सैन्य दलात भरतीसाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले. बेळगावला सैन्य दलाची भरती निघाली. भाऊसाहेब यांच्यासह मित्रमंडळी रेल्वेने बेळगावला गेले. १९ फेब्रुवारी १९९७ रोजी पहिल्याच प्रयत्नात भाऊसाहेब भरती झाले. बेळगावातच सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पहिली नियुक्ती काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील नौसेरामध्ये झाली.राजौरी हा अतिशय थंड हवामान आणि जंगलाने वेढलेला परिसऱ या भागात अतिरेक्यांनी सहारा घेतला होता़ उंचच उंच टेकड्या आणि झाडांची गर्द दाटी यामुळे या अतिरेक्यांना शोधणे लष्करासमोर मोठे आव्हान होते़ हे आव्हान भाऊसाहेब यांनी पेलले आणि केला श्रीगणेशा भारतमातेच्या रक्षणाचा़१९९९ मधील कारगील युद्ध थांबल्यानंतर पाकिस्तानचे अनेक सैनिक तसेच काही दहशतवाद्यांनी भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या टेकड्यांचा आश्रय घेतला होता़ त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी सैन्यदलाने रक्षक आॅपरेशन हाती घेतले होते. १ मार्च २००० साली रक्षक आॅपरेशनमध्ये भाऊसाहेब तळेकर हातात मशिनगन घेऊन अतिरेक्यांच्या दिशेने झेपावले होते़ पहाडी परिसरात सलग २४ तास अतिरेकी आणि भारतीय सैन्यामध्ये संघर्ष सुरु होता़ भाऊसाहेबांनी काही अतिरेक्यांना यमसदनी पाठविले होते. २ मार्च २००० रोजी पहाटेच्या वेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यामधील एक गोळी भाऊसाहेब यांच्या डोक्याला लागली आणि भाऊसाहेब युद्धभूमिवर कोसळले. कोळगावला भाऊसाहेब तळेकर शहीद झाल्याची वार्ता आली.दोनच वर्षांपूर्वी गावातील सचिन साके हे जवान शहीद झाले होते. त्यामुळे कोळगाव परिसर पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला. भाऊसाहेब तळेकर एकुलते एक असल्याने घरी निरोप देण्याचे धाडस कोणीच केले नाही. तीन दिवसानंतर भाऊसाहेब यांचे शव लष्कराच्या वाहनातून घरी आले अन् एकच आक्रोश झाला. भाऊसाहेब यांचे आई, वडील, बहिणींनी हंबरडा फोडला. लष्करी इतमामात या कोळगावच्या भूमिपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.कोळगावात शहीद भवनमाजी उपसभापती बाळासाहेब नलगे यांनी कोळगावमधील वीर जवान सचिन साके व भाऊसाहेब तळेकर यांच्या पराक्रमाची कायम आठवण राहावी म्हणून शहीद भवन बांधण्यासाठी पुढाकार घेतला. याच पुढाकारातून कोळाईदेवी मंदिराच्या पायथ्याशी शहीद भवन उभे राहिले.आधी लगीन बहिणीचेभाऊसाहेब यांच्या लग्नासाठी घरच्यांनी विचार सुरू केला होता. विवाह निश्चित करण्याच्या हालचाली सुरु होत्या. पण भाऊसाहेब यांनी अगोदर बहीण मीनाचे लग्न आणि नंतर माझे असे घरच्यांना सांगितले़ त्यामुळे भाऊसाहेबांच्या लग्नाचा विचार काही दिवस मागे पडला. त्यानंतर काहीच दिवसात आमचा पोटचा एकुलता एक गोळा गेला, अशी आठवण सांगताना वीरमाता सीताबाई यांना हृदयात दाटलेल्या भावना आवरता आल्या नाहीत.निवारा उपलब्धभाऊसाहेब यांनी घर बांधण्याचे ठरविले होते. पण ते कामही अपूर्ण राहिले. भाऊसाहेब शहीद झाल्यानंतर कैलास जगताप यांनी तळेकर कुटुंबाला घरासाठी दोन गुंठे जागा दिली. त्या ठिकाणी तळेकर यांचे घर उभे राहिले. या घरात भाऊसाहेबांचे आई, वडील दोघेच वृद्धापणातील लढाई लढत आहेत.शब्दांकन - बाळासाहेब काकडे /नानासाहेब जठार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत