शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भुतवडा तलावात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:19 IST

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जामखेडचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. चार मे ते पंधरा जून या कालावधीत तलावातील चार लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. सध्या तलावातील पाणी गढूळ असल्याने तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहराला सध्या होणाऱ्या पंधरा दिवसांपासूनच्या पाणीपुरवठ्यातून शहरवासीयांची सुटका होणार आहे. गुरुवारी तलावातील पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे. भुतवडा तलाव तीन महिन्यापूर्वी कोरडा पडला होता. तलावात चाळीस टक्के गाळ असल्याने पाणीसाठा कमी होत होता. गेल्या ४५ वर्षात तलावातील गाळ काढला नव्हता. तलावातील गाळ काढण्यासाठी नगराध्यक्षा प्रीती राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, शिवसेना नेते मधुकर राळेभात, नगरसेवकांनी बैठक घेऊन लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी निधी गोळा करून काम तातडीने सुरवात करण्याची ग्वाही दिली. माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी याकामी पुढाकार घेतला. नगरपरिषदेचे दहा लाख, पुणे महापौर व नगरसेवकांचे पंधरा लाख व शिवसेना जामखेड शाखेने एक लाखाची मदत तातडीने देऊन सहा पोकलॅन मशीन व ३५० ट्रॅक्टरच्या मदतीने अहोरात्र गाळ काढण्यासाठी ४ मे पासून प्रत्यक्षात सुरवात झाली. तलावासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राम शिंदे, पुण्याचे महापौर संतोष जगताप, विश्वदर्शन व पत्रकार संघ, नगरसेवक तसेच अनेक दात्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढल्याने सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. चार ते पाच महिन्यांपासून शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता जलवाहिनीद्वारे जामखेडमधील प्रत्येक गल्लीत पाणी मिळण्यासाठी पंधरा दिवस लागत असे. दुष्काळी परिस्थितीत शहरवासीयांना पाणी विकत घ्यावे लागले तसेच गाळ काढण्यासाठी घरोघर फिरुन मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)