शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

भुतवडा तलावात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:19 IST

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जामखेडचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. चार मे ते पंधरा जून या कालावधीत तलावातील चार लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. सध्या तलावातील पाणी गढूळ असल्याने तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहराला सध्या होणाऱ्या पंधरा दिवसांपासूनच्या पाणीपुरवठ्यातून शहरवासीयांची सुटका होणार आहे. गुरुवारी तलावातील पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे. भुतवडा तलाव तीन महिन्यापूर्वी कोरडा पडला होता. तलावात चाळीस टक्के गाळ असल्याने पाणीसाठा कमी होत होता. गेल्या ४५ वर्षात तलावातील गाळ काढला नव्हता. तलावातील गाळ काढण्यासाठी नगराध्यक्षा प्रीती राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, शिवसेना नेते मधुकर राळेभात, नगरसेवकांनी बैठक घेऊन लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी निधी गोळा करून काम तातडीने सुरवात करण्याची ग्वाही दिली. माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी याकामी पुढाकार घेतला. नगरपरिषदेचे दहा लाख, पुणे महापौर व नगरसेवकांचे पंधरा लाख व शिवसेना जामखेड शाखेने एक लाखाची मदत तातडीने देऊन सहा पोकलॅन मशीन व ३५० ट्रॅक्टरच्या मदतीने अहोरात्र गाळ काढण्यासाठी ४ मे पासून प्रत्यक्षात सुरवात झाली. तलावासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राम शिंदे, पुण्याचे महापौर संतोष जगताप, विश्वदर्शन व पत्रकार संघ, नगरसेवक तसेच अनेक दात्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढल्याने सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. चार ते पाच महिन्यांपासून शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता जलवाहिनीद्वारे जामखेडमधील प्रत्येक गल्लीत पाणी मिळण्यासाठी पंधरा दिवस लागत असे. दुष्काळी परिस्थितीत शहरवासीयांना पाणी विकत घ्यावे लागले तसेच गाळ काढण्यासाठी घरोघर फिरुन मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)