शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
5
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
6
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
8
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
9
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
10
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
11
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
12
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
13
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
14
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
15
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
16
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
17
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
18
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
19
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
20
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...

अहमदनगरमधील मन्याळे गाव पाणीटंचाईने झाले ओसाड, पहावी लागते टँकरची वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 04:42 IST

अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते.

- मच्छिंद्र देशमुखकोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते. धड गुरेही पाळता येत नाहीत. मुलांची लग्नही जमेनात. पाच वर्षापूर्वी ८५ लाख रूपयांची पाणी योजना परत गेली. लालफितीच्या कारभाराने गाव मरण यातना भोगतेय.मन्याळे हे दरवर्षी टँकर मागणारे व शासकीय अनास्थेचे बळी ठरलेले गाव. गावातील तलाव डिसेंबरमध्येच आटतो. कूपनलिका देखील जानेवारीत कोरडी होते. फेब्रुवारीत दरवर्षी गावात टँकर येतो. गावात दोन हजारांवर बॅरल आहेत. पिण्यासाठी व जनावरांना हेच पाणी पाच महिने वापरावे लागते. गावात पाणी नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत. मराठा समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले.पिण्याच्या पाण्यासाठी खोल विहिरीत अक्रूर हांडे हा शेतकरी व एका दहा वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. मन्याळे गावासाठी २०१२ ला राष्ट्रीय पेयजल योजनेतून वाघापूर गावातील मुळा नदीवरून ८५ लाख रूपयांची योजना मंजूर झाली. पैसेही आले. मात्र अचानक वाघापूर गावातील काही लोकांनी योजना बंद केली. त्यात ग्रामसेवकाने वर्कआॅर्डर लवकर न दिल्याने योजना बंद पडली. पैसेही परत गेले.अनेकांना निवेदने दिली. तहसीलसमोर महिलांनी आंदोलन केले. मात्र गावाला पाणी मिळालेच नाही.राज्यात १,२०७ चारा छावण्या झाल्या सुरूपुणे : दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील १० जिल्ह्यांत एकूण १ हजार २०७ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यात लहानमोठ्या ८ लाख ४ हजार ३२० पशुधनाचे संगोपन केले जात आहे. काही भागात चारा उपलब्ध आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्याने पशुधन छावण्यांमध्ये दाखल केले जात असून दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पुढील काळात चारा छावण्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने महसूल विभाग, स्वयंसेवी संस्थांकडून आणि राहत शिबीर म्हणून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAhmednagarअहमदनगर