शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

काकस्पर्श होण्यासाठी श्रीगोंदा शहरामधील बंधा-यातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 20:50 IST

श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देलोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले. एकिकडे शासन पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवत असताना दुसरीकडे काकस्पर्र्शासाठी बंधा-यातील पाणी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाणी सोडून दिल्याने काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरू आहे.सोमवारी सायंकाळी गोरे मळा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले. यावेळी सतीष मखरे, राजू गोरे, अशोक आळेकर, एम.डी. शिंदे उपस्थित होते. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा बंधारा  आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बंधा-यातील पाणी दशक्रिया ओट्यापर्यत आले होते. या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे निवडक लोकांचे म्हणणे होते. या शेवाळयुक्त पाण्यामुळे काकस्पर्श होत नाही त्यामुळे बंधा-यातील पाणी सोडून देण्याची भुमिका सत्ताधारी व विरोधकांनी घेतली. त्यानंतर बंधा-यातील पाणी सोडून देण्यात आले. बंधा-यातील पाणीसोडल्याने नेमके काय साध्य होणार आहे असा सवाल सरस्वती नदी सुशोभीकरणाचे प्रवर्तक गोरख आळेकर यांनी उपस्थित केला आहे.लोकवर्गणीतून बंधा-याचे काम -उन्हाळ््यात या परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत गेल्या वर्षी लोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च केले. या माध्यमातून सरस्वती नदीमधील गाळ काढून रुंदीकरण करण्यात आली. या कामासाठी शासनाने कसल्याही प्रकारची मदत केली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाWaterपाणी