शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

काकस्पर्श होण्यासाठी श्रीगोंदा शहरामधील बंधा-यातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 20:50 IST

श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देलोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले. एकिकडे शासन पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवत असताना दुसरीकडे काकस्पर्र्शासाठी बंधा-यातील पाणी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाणी सोडून दिल्याने काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरू आहे.सोमवारी सायंकाळी गोरे मळा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले. यावेळी सतीष मखरे, राजू गोरे, अशोक आळेकर, एम.डी. शिंदे उपस्थित होते. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा बंधारा  आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बंधा-यातील पाणी दशक्रिया ओट्यापर्यत आले होते. या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे निवडक लोकांचे म्हणणे होते. या शेवाळयुक्त पाण्यामुळे काकस्पर्श होत नाही त्यामुळे बंधा-यातील पाणी सोडून देण्याची भुमिका सत्ताधारी व विरोधकांनी घेतली. त्यानंतर बंधा-यातील पाणी सोडून देण्यात आले. बंधा-यातील पाणीसोडल्याने नेमके काय साध्य होणार आहे असा सवाल सरस्वती नदी सुशोभीकरणाचे प्रवर्तक गोरख आळेकर यांनी उपस्थित केला आहे.लोकवर्गणीतून बंधा-याचे काम -उन्हाळ््यात या परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत गेल्या वर्षी लोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च केले. या माध्यमातून सरस्वती नदीमधील गाळ काढून रुंदीकरण करण्यात आली. या कामासाठी शासनाने कसल्याही प्रकारची मदत केली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाWaterपाणी