शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या नावाखाली ‘मुळा’ धरणाच्या पाण्याचा सुकाळ; आणखी एक शेतीसाठी मिळणार आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:17 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत्र पाण्याचा सुकाळ असल्याचे चित्र आहे.

भाऊसाहेब येवले । लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.  ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत्र पाण्याचा सुकाळ असल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामातील आणखी एक पाण्याचे आवर्तन शेतीसाठी मिळण्याची चिन्हे आहेत. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये यंदा तब्बल ४१ हजार दशलक्ष घनफूट इतके पाणी नव्याने दाखल झाले होते. या आवर्तनामध्ये उजव्या कालव्यात खाली साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पाणी वापर वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आणखी किती दिवस पाणी चालणार याबाबतही सर्वजण अनभिज्ञ आहेत. मुळा धरणाची पाण्याची पातळी घटल्याने वांबोरी चारी पाण्याचे आवर्तन बंद झाले आहे. ४० लाख रुपये पाणीपट्टी वसुली असताना प्रत्यक्षात ३५ हजार रुपये पाणीपट्टी वसूल झाल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. उजव्या कालव्यात खालील पाणीपट्टी थकीत असतानाही पाण्याचे आवर्तन सुरू आहे.उजवा कालवा कधी बंद होणार?मुळा धरणाच्या भरवशावर शेतक-यांनी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढविले आहे, असा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे.  राहुरी तालुक्यात १२ हजार हेक्टर, नेवासा  तालुक्यात ३५ हजार हेक्टर  तर शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात २० हजार हेक्टर ऊस लागवड झाली असल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे. उजव्या कालव्यात खाली २७९ पाणीवापर संस्था तर डाव्या कालव्याखालील १६ पाणीवापर संस्था आहेत. डाव्या कालव्याचे आवर्तन  सहाशे क्युसेकवरून २०  क्युसेक करण्यात आले आहे. डावा कालवा लवकरच बंद होत असून उजवा कालवा कधी बंद होणार याबाबत उत्सुकता आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी