शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विसापूर तलावातील पाणी संपले; १७ गावात पाणीबाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 15:10 IST

नगर तालुुक्यातील १७ गावांना ऐन दुष्काळात वरदान ठरलेली घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन पावसाळ्यात पाण्याअभावी बंद पडली आहे़ विसापूर धरणातील पाणी  संपल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसापासून योजना बंद करण्यात आली आहे़

केडगाव : नगर तालुुक्यातील १७ गावांना ऐन दुष्काळात वरदान ठरलेली घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन पावसाळ्यात पाण्याअभावी बंद पडली आहे़ विसापूर धरणातीलपाणी  संपल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसापासून योजना बंद करण्यात आली आहे़ मात्र, कुकडी अधिका-यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे़विसापूर धरण क्षेत्रावर अवलंबून असणा-या शेतक-यांच्या मोटारी सुद्धा बंद करण्याची वेळ आली आहे़ पावसाळ्यात ही अवस्था झाली असून, पुढील काळात काय होणार, याची चिंता लाभधारक गावांमध्ये वाढली आहे़ घोसपुरी योजनेतून १५ गावांना पाणीपुरवठा होतो़ तसेच तालुक्यातील इतर गावांचे पाण्याचे टँकरही या योजनेवरुन भरले जातात़ मात्र, पाणीच नसल्यामुळे या योजनेवरील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे लोकांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे़ तालुक्यात प्यायला पाणी नाही़ जनावरांनाही प्यायला पाणी नाही़ अशी पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही़ त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे़घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना समितीचे अध्यक्ष संदेश कार्ले व योजनेत समाविष्ट गावातील सरपंचांनी निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे़ विसापूर तलावातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. या योजनेतून पिण्याचे टँकर भरले जातात़ योजना बंद झाल्याने हे टँकर आता बंद झाले आहेत़ तालुक्यात पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई आहे़ यामुळे टँकर व योजना सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीसाठा दुप्पट करून तो राखीव करण्याची मागणी कार्ले यांनी केली.

टॅग्स :DamधरणWaterपाणी