शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

व्हीआरडीई स्थलांतराला अखेर ब्रेक; कसलाच प्रस्ताव नाही, सुजय विखे यांनी घेतली दिल्लीत संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:31 IST

नगर शहरातील व्हीआरडीई स्थलांतराला अखेर ‘ब्रेक’ मिळाला.  या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

अहमदनगर : नगर शहरातील व्हीआरडीई स्थलांतराला अखेर ‘ब्रेक’ मिळाला.  या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

व्हीआरडीईच्या स्थलांतराबाबत माहिती मिळाल्यानंतर खासदार विखे यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्ली येथे व्हीआरडीईचे चेअरमन यांचे तांत्रिक सल्लागार संजीव कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. व्हीआरडीई स्थलांतरणाबाबत सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नगरमधील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा विचार नाही. तसेच भविष्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मार्गदर्शनाखाली आत्‍मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण विभागाच्‍या या संस्‍थेचे अधिक बळकटीकरण करण्‍याचा केंद्र सरकारचा मानस आहे. अन्‍य प्रकल्‍पही देण्‍याबाबतचा विचार व्‍हीआरडीईच्‍या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्वत: खुलासा करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेCentral Governmentकेंद्र सरकार