शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

मतदान यंत्रांची आज सरमिसळ

By admin | Updated: June 21, 2024 17:32 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ गुरुवारी करण्यात येणार आहे़

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ गुरुवारी करण्यात येणार आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामात सकाळी १० वाजता ही कार्यवाही होणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे़विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे़ मतदानासाठी सन २००६ नंतरचे मतदान यंत्र वापरण्यात येणार आहेत़ उत्तर प्रदेशातून ही यंत्र आणण्यात आली आहेत़ उत्तर प्रदेशातून आणलेली ९ हजार ४०० मतदान यंत्र नागापूर येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत़ यंत्रांची तपासणी करण्यात आली असून, मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांची सरमिसळ करण्यात येणार आहे़ राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थित ही प्रक्रिया राबविली जाणार असून, सर्व राजकीय पक्षांना तसे कळविण्यात आले आहे़ त्यानंतर ही मतदान यंत्र मतदारसंघातील मतदान केंद्रांवर रवाना केली जाणार आहेत़जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ५९३ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे़ नगर शहर वगळता उर्वरित मतदारसंघात नेहमीचे मतदान यंत्र असणार आहेत़ नगर शहरात व्हीव्हीपीटी यंत्र वापरले जाणार आहे़ त्यामुळे आपण कुणाला मतदान केले, याची माहिती काही सेकंदात मतदारांना मिळणार आहे़ शहरातील २६५ मतदान केंद्रांवर ही यंत्र जोडली जाणार आहेत़ मतदान यंत्रांची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली जाणार असून,त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)