शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

मतदारांनो डायल @ १९५० : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 11:54 IST

देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

अहमदनगर : देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्र्क केंद्राची स्थापना करण्यात आली असून तेथे ‘१९५०’ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीबाबत असलेल्या प्रश्नांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, मतदारयादीतील नाव व अनुक्रमांक, मतदारयादीत नाव समाविष्ट करणे किंवा दुरूस्त करणे यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने नागरिकांना व मतदारांना माहिती जिल्हा केंद्रातील ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: या क्रमांकावर दूरध्वनी करून या केंद्राचे औपचारिक उद्घाटन केले.जिल्हा निवडणूक शाखेतील लिपिक स्वाती राठोड यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मतदारांना येथे संपर्क करता येईल. प्रत्यक्ष निवडणूक कालावधीमध्ये हे केंद्र अहोरात्र सुरू राहणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लँडलाईन दूरध्वनी क्रमांकावरून उपलब्ध असून लवकरच मोबाईलवरूनही उपलब्ध करण्यात येईल. सर्व मतदारांनी यावर संपर्क करून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका