शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

पदस्पर्श दर्शनाची साईभक्तांना आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:03 IST

आषाढीला लाखो भाविकांची गर्दी होऊनही पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचा पदस्पर्श घडतो.

प्रमोद आहेरशिर्डी : आषाढीला लाखो भाविकांची गर्दी होऊनही पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचा पदस्पर्श घडतो. यामुळे त्यांचा सर्व शिणभाग जातो़ शिर्डीत मात्र काही हजारांची गर्दी असतानाही सामान्य भाविकाला साईसमाधी तर सोडा चौथाºयालाही हस्तस्पर्श करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक साईभक्तालाही पदस्पर्श दर्शनाची आस आहे.अलीकडच्या काळात शिर्डीत अनेक सुविधा निर्माण झाल्या़ पूर्वी अनेक अडचणींचा सामना करूनही भाविक मनासारखे दर्शन घडल्याने पुन्हा येण्याचा संकल्प करून आनंदाने शिर्डी सोडत़ ज्यासाठी भाविक सगळा त्रास सोसतो ते दर्शनही त्याला मनासारखे मिळत नाही. सुरक्षा रक्षकांच्या ‘चलो आगे’चा जप ऐकत मूर्तीला हात जोडून तो केव्हा बाहेर पडतो, हे भाविकालाही कळत नाही़ व्हीआयपी भाविकांना दर्शनासाठी समाधीची काच काढली जाते. समाधीवर माथा टेकविण्याची संधी दिली जाते. सामान्य भाविकाला मात्र या काचांमुळे समाधी तर दूरच चौथाºयालाही हात लावता येत नाही़अनेक जण समाधीवर माथा टेकवला की दूर होत नाहीत. त्यामुळे दर्शन रांग पुढे सरकत नाही, असे सांगितले जाते़ सुरक्षा रक्षकांचा थोडा त्रास कमी करण्यासाठी भाविकांना समाधी स्पर्शापासून वंचित ठेवणे योग्य नाही़ काचे ऐवजी सव्वा फुटाची जाळी लावली तर वरील बाजूने समाधी दिसत नाही. किमान चौथाºयाला तरी हात लावून दर्शन घेता येईल़मंदिरात सुरक्षा रक्षकांना खाकी ऐवजी चोपदाराचे पारंपरिक गणवेश दिले तर रक्षकांमध्ये आपोआप नम्रता येईल. भाविकांनाही त्यांच्याविषयी आदर वाटल्याने परस्परांमध्ये सुसंवाद होईल, मात्र याबाबत काही होत नाही़साईदर्शनाला येणाºया भाविकांची वाहने तपासणीच्या नावाखाली अडवून अनेक ठिकाणी पोलिसांकडून आर्थिक व मानसिक छळवणूक होते. भाविकांची चेनस्रेचिंग, पाकीटमारी करणारे, चुकीची माहिती देऊन पूजेच्या वस्तू खरेदीत किंवा रूम घेताना अव्वाच्या सव्वा कमिशन उकळणारे, जादा पैसे घेऊनही भाविकांशी वाद घालणारे, प्रसंगी मारहाणही करणारे खासगी प्रवासी, वाहतूकदार, दुकानदार कमी नाहीत. (उत्तरार्थ).नगर पंचायत, ग्रामस्थांकडून सहकार्याची भाविकांना अपेक्षासाईनगरीत येणाºया भाविकांवर शिर्डीतील हजारो लोकांचे संसार उभे आहेत़ त्यामुळे भाविकांना योग्य सन्मान देणे व नम्रतेने बोलण्याबरोबच त्यांचे येथील वास्तव्य व दर्शन आनंददायी होणे गरजेचे आहे.त्यांनी पुन्हा पुन्हा यावे, यासाठी संस्थान, नगरपंचायत, ग्रामस्थांकडून संयुक्त प्रयत्न व्हावेत़, अशी भाविकांची अपेक्षा आहे. शहरात स्वच्छतेचीही गरज असल्याचे भाविकांचे मत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी