शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
6
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
7
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
8
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
9
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
10
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
11
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
12
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
13
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
14
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
15
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
16
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
17
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
18
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
19
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
20
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!

पदस्पर्श दर्शनाची साईभक्तांना आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:03 IST

आषाढीला लाखो भाविकांची गर्दी होऊनही पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचा पदस्पर्श घडतो.

प्रमोद आहेरशिर्डी : आषाढीला लाखो भाविकांची गर्दी होऊनही पंढरपुरात प्रत्येक वारकऱ्याला पांडुरंगाचा पदस्पर्श घडतो. यामुळे त्यांचा सर्व शिणभाग जातो़ शिर्डीत मात्र काही हजारांची गर्दी असतानाही सामान्य भाविकाला साईसमाधी तर सोडा चौथाºयालाही हस्तस्पर्श करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक साईभक्तालाही पदस्पर्श दर्शनाची आस आहे.अलीकडच्या काळात शिर्डीत अनेक सुविधा निर्माण झाल्या़ पूर्वी अनेक अडचणींचा सामना करूनही भाविक मनासारखे दर्शन घडल्याने पुन्हा येण्याचा संकल्प करून आनंदाने शिर्डी सोडत़ ज्यासाठी भाविक सगळा त्रास सोसतो ते दर्शनही त्याला मनासारखे मिळत नाही. सुरक्षा रक्षकांच्या ‘चलो आगे’चा जप ऐकत मूर्तीला हात जोडून तो केव्हा बाहेर पडतो, हे भाविकालाही कळत नाही़ व्हीआयपी भाविकांना दर्शनासाठी समाधीची काच काढली जाते. समाधीवर माथा टेकविण्याची संधी दिली जाते. सामान्य भाविकाला मात्र या काचांमुळे समाधी तर दूरच चौथाºयालाही हात लावता येत नाही़अनेक जण समाधीवर माथा टेकवला की दूर होत नाहीत. त्यामुळे दर्शन रांग पुढे सरकत नाही, असे सांगितले जाते़ सुरक्षा रक्षकांचा थोडा त्रास कमी करण्यासाठी भाविकांना समाधी स्पर्शापासून वंचित ठेवणे योग्य नाही़ काचे ऐवजी सव्वा फुटाची जाळी लावली तर वरील बाजूने समाधी दिसत नाही. किमान चौथाºयाला तरी हात लावून दर्शन घेता येईल़मंदिरात सुरक्षा रक्षकांना खाकी ऐवजी चोपदाराचे पारंपरिक गणवेश दिले तर रक्षकांमध्ये आपोआप नम्रता येईल. भाविकांनाही त्यांच्याविषयी आदर वाटल्याने परस्परांमध्ये सुसंवाद होईल, मात्र याबाबत काही होत नाही़साईदर्शनाला येणाºया भाविकांची वाहने तपासणीच्या नावाखाली अडवून अनेक ठिकाणी पोलिसांकडून आर्थिक व मानसिक छळवणूक होते. भाविकांची चेनस्रेचिंग, पाकीटमारी करणारे, चुकीची माहिती देऊन पूजेच्या वस्तू खरेदीत किंवा रूम घेताना अव्वाच्या सव्वा कमिशन उकळणारे, जादा पैसे घेऊनही भाविकांशी वाद घालणारे, प्रसंगी मारहाणही करणारे खासगी प्रवासी, वाहतूकदार, दुकानदार कमी नाहीत. (उत्तरार्थ).नगर पंचायत, ग्रामस्थांकडून सहकार्याची भाविकांना अपेक्षासाईनगरीत येणाºया भाविकांवर शिर्डीतील हजारो लोकांचे संसार उभे आहेत़ त्यामुळे भाविकांना योग्य सन्मान देणे व नम्रतेने बोलण्याबरोबच त्यांचे येथील वास्तव्य व दर्शन आनंददायी होणे गरजेचे आहे.त्यांनी पुन्हा पुन्हा यावे, यासाठी संस्थान, नगरपंचायत, ग्रामस्थांकडून संयुक्त प्रयत्न व्हावेत़, अशी भाविकांची अपेक्षा आहे. शहरात स्वच्छतेचीही गरज असल्याचे भाविकांचे मत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी