शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कामरगावात संतप्त गावक-यांच्या हल्ल्यात बिबट्या ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 20:02 IST

आठवड्यापासून गावात बिबट्या धुमाकूळ घालत असतानाही वनविभागाने पिंजरा न लावल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला मारले

केडगाव : नगर - पुणे रस्त्यालगत असणा-या कामरगाव ( ता. नगर )  येथे आज बिबट्याने तब्बल सहा तास धूमाकूळ घालत महिलेसह दोघांवर हल्ला केला. दरम्यान गावातील एका बहादराने थेट बिबट्याला झडप घालत पकडण्याचे धाडस केले. यावेळी संतप्त गावक-यांनी केलेल्या झटापटीत बिबट्या ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.नगर तालुक्यातील कामरगाव येथे  गुरुवार (दि.२०) दुपारी १ च्या दरम्यान  गावातील  महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ठोकळ वस्ती येथे घडली. या हल्ल्यात शालिनी सुरेश ठोकळ (वय-३२) गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली. ठोकळ वस्ती परिसरात शालिनी ठोकळ व रोहिणी संतोष कदम या दोन महिला शेतात चालल्या होत्या. यावेळी बिबट्याने शालिनी ठोकळ यांच्या अंगावर झेप घेतली. पाठिला व मानेला चावा घेतला. यावेळी रोहिणी कदम यांनी हातात दगडाने मारा केल्याने बिबट्याने धूम ठोकली व शेजारील असलेल्या ज्वारीच्या पिकात दडून बसला. या ठिकाणी बिबट्याचे दोन पिले ही आढळून आली आहेत. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचा-याने रुग्णवाहिकेला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच सरपंच सीमा साठे यांचे पती गणेश साठे यांनी तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती सांगितली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला गणेश साठे यांच्यासह मच्छिंद्र जाधव, दादा ठोकळ, सुनील कातोरे, तुकाराम कातोरे, सुरेश ठोकळ यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

गावात बिबटया आल्याची बातमी गावात पसरताच हजारोच्या संख्येने गावकरी गावात जमा झाले.  यामुळे नगर - पुणे मार्ग ठप्प झाला.  गावातील तान्हाजी माळी या गावक-याने बिबट्याचा शोध घेत त्यावर एकट्यानेच झडप घालण्याचे धाडस केले. त्यात माळी जखमी झाले. गावक-यांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी बिबट्या व गावकरी यांच्यात झटापट होऊन बिबट्या मृत झाला. बिबट्या मृत झाल्याचे समजताच वनविभाग व पोलिस पथकाने गावात भेट दिली.

बिबट्या आराम करत असावा. त्याचवेळी तेथे मोठा जमाव आला. या बिबट्याच्या पोटाला मोठ्या जखमा आहेत. या जखमांमुळे बिबट्याचा मृत्यू झाला आहे. - भास्कर शिंदे,  वनपरिक्षेत्रपाल , नगर तालुका वन विभाग,

पिंजरा न आल्याने गावकरी संतापलेघटनेची माहिती मिळताच विभागाचे पथक दाखल झाले. परंतु, वनविभागाकडे पिंजरा उपलब्ध नसल्याने त्यांनी अळकुटी (ता.पारनेर) येथून पिंजरा आणावा लागेल असे सांगितले असता सरपंच पती गणेश साठे यांनी गावातील वाहन पिंजरा आणण्यासाठी अळकुटीला पाठविले. परंतु गावात पिंजरा येण्यापूर्वीच बिबट्या ठार झाला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय