शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

साईदरबारातील जाचक नियमांविरुध्द ग्रामस्थ एकवटले; शिर्डी बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:59 IST

शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे.

शिर्डी : ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे.

ग्रामस्थांच्या मागणीवर २९ जानेवारीपर्यंत निर्णय घेतला नाही तर ३० जानेवारीला गाव बंद ठेवून मोर्चा व उपोषणाचा मार्ग अवलंबवण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीयांच्या वतीने कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, निलेश कोते आदींनी दिला.

ग्रामस्थ व पत्रकारांसाठी नियमावली करण्याच्या संस्थानच्या एकतर्फी प्रयत्नांना विरोध सुरू झाला आहे. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूरसारख्या जुन्या देवस्थांनाच्या ठिकाणीही ग्रामस्थांना वर्षानुवर्षे हक्क आहेत. संस्थानने तिरूपती देवस्थान नजरेसमोर ठेवतांना तेथील भौगोलिक परिस्थीती विचारात घेतली नसावी. तिरूपतीचे तंत्रज्ञान जसे उत्तम तसेच शेगावचे दर्शनही आनंददायी आहे. चांगल्या बाबींचे अनुकरण करतांना स्थानिक परिस्थीती व तेथील गरजा दुर्लक्षित करता येणार नाहीत.

 

सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या कार्य पद्धतीबद्दल आक्षेप असतील पण त्यांच्या हेतूबद्दल, भरपूर वेळ देण्याबद्दल व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल शंका नाही. सध्या व्हीआयपींना जेवढा सन्मान मिळतो त्यातील थोडासा सामान्य भक्त, ग्रामस्थ व पत्रकारांच्या पारड्यातही पडावा. लवचिकता व समन्वयाचा अभाव असलेल्या प्रशासनाच्या एकतर्फी भूमिकेवर ग्रामस्थ, पत्रकार, कर्मचारी नाराज आहेत. याबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून काही जणांनी मंदिरात गोरखधंदे सुरू केले आहेत, याबाबत भक्त व सुज्ञ ग्रामस्थही नाराज आहेत. साईदरबारातील अपप्रवृत्ती दूर करून मंदिराचे पावित्र्य व आपला सन्मान अबाधित ठेवण्यासाठी नियमावलीची नाही तर आचारसंहितेची गरज आहे.

सध्या साईदर्शन आनंददायी झाले आहे़ यात दर्शनार्थींची थोडी संख्या वाढवली. द्वारकामाईचे दर्शन पूर्ववत केले आहे. महाद्वारातील वावर सुरू केला तर अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर यायला मदत होईल, असे मत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले.

ग्रामस्थांबरोबरच चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यास आम्ही तयार आहोत. ग्रामस्थांनीच उपाययोजना सुचवाव्या. कोवीड संपल्यानंतर सध्याचे नियम आणखी शिथील होतील.

         -कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा