शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साईदरबारातील जाचक नियमांविरुध्द ग्रामस्थ एकवटले; शिर्डी बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:59 IST

शिर्डी ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे.

शिर्डी : ग्रामस्थांना नियमांच्या जोखडात अडकावणा-या साईस्थानच्या एकतर्फी प्रयत्नाने शिर्डीकरांची सबुरी ऐरणीवर आली आहे. जाचक नियम लादण्याऐवजी सर्वसहमतीने आचारसंहिता ठरवणे गरजेचे झाले आहे.

ग्रामस्थांच्या मागणीवर २९ जानेवारीपर्यंत निर्णय घेतला नाही तर ३० जानेवारीला गाव बंद ठेवून मोर्चा व उपोषणाचा मार्ग अवलंबवण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीयांच्या वतीने कैलास कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, निलेश कोते आदींनी दिला.

ग्रामस्थ व पत्रकारांसाठी नियमावली करण्याच्या संस्थानच्या एकतर्फी प्रयत्नांना विरोध सुरू झाला आहे. पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूरसारख्या जुन्या देवस्थांनाच्या ठिकाणीही ग्रामस्थांना वर्षानुवर्षे हक्क आहेत. संस्थानने तिरूपती देवस्थान नजरेसमोर ठेवतांना तेथील भौगोलिक परिस्थीती विचारात घेतली नसावी. तिरूपतीचे तंत्रज्ञान जसे उत्तम तसेच शेगावचे दर्शनही आनंददायी आहे. चांगल्या बाबींचे अनुकरण करतांना स्थानिक परिस्थीती व तेथील गरजा दुर्लक्षित करता येणार नाहीत.

 

सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या कार्य पद्धतीबद्दल आक्षेप असतील पण त्यांच्या हेतूबद्दल, भरपूर वेळ देण्याबद्दल व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल शंका नाही. सध्या व्हीआयपींना जेवढा सन्मान मिळतो त्यातील थोडासा सामान्य भक्त, ग्रामस्थ व पत्रकारांच्या पारड्यातही पडावा. लवचिकता व समन्वयाचा अभाव असलेल्या प्रशासनाच्या एकतर्फी भूमिकेवर ग्रामस्थ, पत्रकार, कर्मचारी नाराज आहेत. याबाबत आत्मचिंतन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांपासून काही जणांनी मंदिरात गोरखधंदे सुरू केले आहेत, याबाबत भक्त व सुज्ञ ग्रामस्थही नाराज आहेत. साईदरबारातील अपप्रवृत्ती दूर करून मंदिराचे पावित्र्य व आपला सन्मान अबाधित ठेवण्यासाठी नियमावलीची नाही तर आचारसंहितेची गरज आहे.

सध्या साईदर्शन आनंददायी झाले आहे़ यात दर्शनार्थींची थोडी संख्या वाढवली. द्वारकामाईचे दर्शन पूर्ववत केले आहे. महाद्वारातील वावर सुरू केला तर अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर यायला मदत होईल, असे मत नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले.

ग्रामस्थांबरोबरच चर्चा करून हा प्रश्न सोडवण्यास आम्ही तयार आहोत. ग्रामस्थांनीच उपाययोजना सुचवाव्या. कोवीड संपल्यानंतर सध्याचे नियम आणखी शिथील होतील.

         -कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईसंस्थान.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा