शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

अहमदनगरमधील ‘त्या’ मतदान यंत्रांची हाेणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 10:51 IST

या अर्जांवर निवडणूक आयोग ४५ दिवस प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाने हे निर्देश दिले आहेत. 

नीलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट) यांनी भाजपचे  डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा २८,९२९ मतांनी पराभव केला. निवडणूक आयोगाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे एकूण ८ आणि राज्य विधानसभेबाबतचे ३ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांवर निवडणूक आयोग ४५ दिवस प्रतीक्षा करणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल.

फेरमतमोजणी होणार नाही, केवळ मशिन तपासणारबंगळूर येथील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट निर्मिती करणाऱ्या बेल कंपनीच्या अभियंत्याकडून निश्चित केलेल्या दिवशी ४० मतदान केंद्रांवरील बॅलेट कंट्रोल युनिट (बीयू), व्हीव्हीपॅट व ईव्हीएम मशिन या यंत्रांची तपासणी केली जाईल. यामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? एवढेच तपासले जाईल. फेरमतमोजणी केली जाणार नाही, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल पाटील यांनी दिली.

या मतदान केंद्रांवर होणार तपासणी शेवगाव (५), राहुरी (५), पारनेर (१०), अहमदनगर शहर (५), श्रीगोंदा (१०) आणि कर्जत जामखेड (५). 

टॅग्स :ahmednagar-pcअहमदनगरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग