शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

भाजीपाला कडाडला, डाळींनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:16 IST

अहमदनगर : मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसात डाळींचे भाव आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.

सुदाम देशमुखअहमदनगर : मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसात डाळींचे भाव आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.

आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. पुणे, मुंबई परिसरात मोठा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली. परिणामी जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आणि दरवाढ झाली. डाळींच्या भावातही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच डाळी शंभरीपार गेल्या आहेत. पाऊस, डाळ मीलवर अद्याप कामगार येत नसल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

 

यंदा पावसामुळे उडिदाचे उत्पादन कमी झाल्याने आपोआप तेजी निर्माण झाली असल्याने किराणा मालाचे भाव वाढले आहेत. जसा माल आला तसा तो विकला जात असून शिल्लकीचे प्रमाण कमी आहे. उत्पादन कमी हेच दरवाढीमागचे कारण आहे.-संजय लोढा, ठोक व्यापारी

हरभºयाचे उत्पादन प्रचंड झाल्याने हरभरा डाळीचे भाव कमी झाले होते. मात्र आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने हरभरा डाळीला मागणी वाढली आहे. बाहेरच्या राज्यात पाऊस झाला असून कामगारांची टंचाई असल्याने माल कमी प्रमाणात येत असून त्यामुळे दरवाढ झाली आहे.-संजय साखरे, किराणा दुकानदार

दोन महिन्यांपासून पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे भाजीपाल्याची नासाडी झाली. भाजीपाला कमी असल्याने आणि मागणी वाढल्याने दरवाढ होत आहे.   

 -शरद बोबडे, विक्रेते

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरvegetableभाज्या