शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

 शेतक-यांच्या शेतीमालाविषयी केंद्रिय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 19:01 IST

देशात प्रत्येक माल बनविणारा त्या मालाची किंमत स्वत: ठरवतो. परंतु, शेतकरी असा एक घटक आहे की, त्याला त्याने पिकविलेल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषि मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ लाख लोकसंख्या असणा-या २५ शहरांकरीता महा शेतकरी उत्पादक संघटना स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिली.

राहुरी : देशात प्रत्येक माल बनविणारा त्या मालाची किंमत स्वत: ठरवतो. परंतु, शेतकरी असा एक घटक आहे की, त्याला त्याने पिकविलेल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. ही वस्तुस्थिती बदलण्यासाठी कृषि मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील २५ लाख लोकसंख्या असणा-या २५ शहरांकरीता महा शेतकरी उत्पादक संघटना स्थापना केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिली.महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट-कासम या प्रकल्पांतर्गत ‘शेतीमालाच्या विपणनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर एक आठवड्याचे आॅनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सोमवारी (दि.४ मे) प्रमुख पाहुणे म्हणून कैलाश चौधरी यांंनी कृषि शास्त्रज्ज्ञांशी आॅनलाईन संवाद साधला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा होते. महा एफ.पी.ओ. शीतगृह यंत्रणेसह इतर महत्वाच्या गरजांसाठी २० करोडपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या महा एफ.पी.ओ. मार्फत भाजीपाला उत्पादक शेतक-यांच्या मालाचे ट्रेडींग केले जाणार आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या मालाचा भाव स्वत: ठरवतील. जेणे करुन शेतक-यांना आर्थिक स्वायतत्ता मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास तो कर्ज घेणारा नव्हे, तर कर्ज देणारा बनेल, असेही चौधरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी, केंद्रिय कृषि मंत्रालयाचे अतिरिक्त खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, राहुरीचे माजी विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख, प्रशिक्षणाचे निमंत्रक डॉ. सुनील गोरंटीवार, सहनिमंत्रक डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरी