शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
"मराठी माणूस खतरे में है, मग ३० वर्ष तुम्ही..." फडणवीस यांचा ठाकरेंवर निशाणा
3
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
4
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
5
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
6
WPL मध्ये २४ तासांच्या आत विक्रमाची पुनरावृत्ती! ग्रेसनं केली सोफीची बरोबरी; त्यातही कमालीचा योगायोग
7
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
8
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
9
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
10
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
11
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
12
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
13
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
14
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
15
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
17
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
18
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
19
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
20
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्‍यांत वाढली अस्वस्थता

By admin | Updated: May 11, 2014 00:54 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचार्‍यांच्या बदल्यांची पक्रिया सुरू होणार आहे.

 अहमदनगर : जिल्हा परिषद लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कर्मचार्‍यांच्या बदल्यांची पक्रिया सुरू होणार आहे. मात्र, प्रशासकीय बदल्यांवरून कर्मचार्‍यांत गोंधळाची स्थिती असून विशेष करून प्राथमिक शिक्षकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. बदल्यांपूर्वी मुख्याध्यापक, उपशिक्षक यांच्या पदोन्नत्या आणि समायोजन केल्यास त्याचा फायदा शिक्षकांना होईल अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कर्मचार्‍यांची ५ टक्के प्रशासकीय आणि १० टक्के बदल्या होत असतात. गेल्या वर्षी प्रशासकीय बदल्यां सोबत आपसी बदल्या झाल्या. मात्र, ऐनवेळी काही जिल्हा परिषद सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने त्यांना स्थगिती देण्यात आली. यंदा लोकसभा निवडणुका झालेल्या असून काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे प्रशासकीय बदल्यांमध्ये सुट मिळेल, अशी अपेक्षा कर्मचार्‍यांमध्ये आहे. जिल्हा परिषदेत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामपंचायत हे सर्वात मोठे संवर्ग आहेत. यातही प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्याचे दिव्य प्रशासना समोर आहे. १५ दिवसांपासून जिल्हा परिषद प्रशासाने बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. यात बदली पात्र कर्मचार्‍यांची सेवा ज्येष्ठता यादी, विनंती बदली शिक्षकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान, शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी मुख्याध्यापक आणि उपशिक्षकांची पदोन्नती करणे आवश्यक आहे. बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानूसार जिल्ह्यात सुमारे ६०० शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. पूर्वी पहिली ते सातवीपर्यंत कितीही पट (विद्यार्थी संख्या) असली तरी मुख्याध्यापकांच्या पदाला मान्यता होती. मात्र, आता नवीन कायद्यानूसार १ ते १५० पटसंख्येपर्यंत मुख्याध्यापक पदाला मान्यता आहे. यामुळे ३०० मुख्याध्यापक आणि ३०० उपशिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यामुळे या मुख्याध्यापकांचे समायोजन आणि पदोन्नती आधी होणे आवश्यक आहे. त्यानंतर बदल्यांची प्रक्रिया राबविल्यास शिक्षकांची सोय होणार आहे. १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी मुंबईत ग्रामविकास मंत्री यांची भेट घेवून प्रशासकीय बदल्या रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आहे. मात्र, प्रत्यक्षात असा कोणताच निर्णय निघालेला नाही. यामुळे शिक्षकांसह सर्वांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी) सोमवारी बैठक शिक्षकांच्या बदल्या, त्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी १२ तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक बोलावली आहे. यात बदल्या, समायोजन आणि पदोन्नतीबाबत चर्चा होणार आहे. प्रशासनाने शासनाच्या धोरणानूसार शिक्षकांच्या बदल्या कराव्यात. मात्र, त्या करत असताना शिक्षकांची सोय पाहावी. गेल्यावर्षी पेसा कायद्याचा फटका अनेकांना बसला आहे. यामुळे आधी पदोन्नती, मग समायोजन आणि त्यानंतर बदल्या कराव्यात. यात प्रशासनाचा ताण कमी होणार आहे. -रावसाहेब रोहकले, शिक्षक नेते.