शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:44 IST

तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधीत विभागाकडून या शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

- अशोक निमोणकर

जामखेड - शेतातील काम आटोपून बैलगाडीतून  पती-पत्नी घरी परतत असताना रस्त्यातील पाण्यात विद्युत पोलचा वीजप्रवाह उतरल्याने बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसला. यामध्ये दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैलाच्या खांद्यावर असलेले जू लोखंडी असल्याने प्रसंगावधान राखून बैलगाडीत बसलेल्या पती व पत्नीने उडी मारल्याने ते या अपघातातून वाचले. सदर घटना गुरुवारी दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावात घडली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात गेले होते. दिवसभरातील शेतातील काम आटोपले असताना पाऊस सुरू झाला होता. बैलगाडीत गवताचे भारे टाकुन पती पत्नी हे बैलगाडीतून आपल्या घरी येत असतानाच वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीजप्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता. 

या सुमारास  बैलगाडी या पाण्यातून जात असतानाच अचानक या बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे बैलांचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून बैलगाडी मध्ये गवताच्या वरती बसलेल्या पती-पत्नी यांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या अपघातून वाचले आहेत. याबाबत शेतकर्‍याच्या दोन्ही बैलांचा या अपघातात दुर्दैवी मुत्यू झाला आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधीत विभागाकडून या शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर