शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

विजेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 13:44 IST

तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधीत विभागाकडून या शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

- अशोक निमोणकर

जामखेड - शेतातील काम आटोपून बैलगाडीतून  पती-पत्नी घरी परतत असताना रस्त्यातील पाण्यात विद्युत पोलचा वीजप्रवाह उतरल्याने बैलगाडीच्या बैलांना विजेचा शॉक बसला. यामध्ये दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. बैलाच्या खांद्यावर असलेले जू लोखंडी असल्याने प्रसंगावधान राखून बैलगाडीत बसलेल्या पती व पत्नीने उडी मारल्याने ते या अपघातातून वाचले. सदर घटना गुरुवारी दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावात घडली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून सकाळी शेतात गेले होते. दिवसभरातील शेतातील काम आटोपले असताना पाऊस सुरू झाला होता. बैलगाडीत गवताचे भारे टाकुन पती पत्नी हे बैलगाडीतून आपल्या घरी येत असतानाच वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीजप्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता. 

या सुमारास  बैलगाडी या पाण्यातून जात असतानाच अचानक या बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामुळे बैलांचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून बैलगाडी मध्ये गवताच्या वरती बसलेल्या पती-पत्नी यांनी गाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या अपघातून वाचले आहेत. याबाबत शेतकर्‍याच्या दोन्ही बैलांचा या अपघातात दुर्दैवी मुत्यू झाला आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने तातडीने घटनेचा पंचनामा करुन संबधीत विभागाकडून या शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थाकडुन होत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर