शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार शिक्षक बदलीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:20 IST

लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीमुळे लांबलेल्या बदल्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु असून, जिल्ह्यातील २ हजार ५७६ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत़ सोमवारपासून या बदल्यांना प्रारंभ होणार आहे़जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक (उपाध्यापक, पदवीधर, मुख्याध्यापक) या संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे़ सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे व एका शाळेवर तीन वर्ष पुर्ण झालेले, अवघड क्षेत्रात तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा केलेले शिक्षक व महिलांसाठी अवघड क्षेत्रात १ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षिका बदलीस पात्र ठरविण्यात आले आहेत़ या बदलीपात्र प्राथमिक शिक्षकांची यादी अवघड क्षेत्र तसेच अवघड क्षेत्रातील महिलांसाठी प्रतिकूल असलेल्या शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे़ त्यानुसार अवघड क्षेत्रात एकूण ३६८ शळा असून, महिलांसाठी अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळांची संख्या ३४१ आहे़ अवघड क्षेत्रात काम केलेले बदलीस पात्र ठरलेले मराठी माध्यमातील शिक्षक व शिक्षिका यांची संख्या सुमारे ४६२ आहे तर उर्दू माध्यमातील बदलीस पात्र ठरलेले शिक्षक ५ आहेत़शिक्षकाचा जोडीदाराची हृदय शस्त्रक्रिया झाली असल्यास, एकच मुत्रपिंड असल्यास किंवा डायलिसीस सुरु असल्यास, कॅन्सरने आजारी असल्यास, मेंदूचा आजार असल्यास, थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक असल्यास अशा शिक्षक किंवा शिक्षिकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणार आहे़ तसेच ज्या शिक्षकांच्या बदलीसंदर्भात तक्रारी असतील, त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, उपमुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) वासुदेव साळुंके, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची समिती गठीत करण्यात आली आहे़ या समितीकडे बदलीचा आदेश निघाल्यापासून ७ दिवसात तक्रार लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे़ शिक्षकांच्या या तक्रारीवर ३० दिवसात निर्णय द्यावा, असे सरकारने बदल्यांच्या आदेशात म्हटले आहे़पती-पत्नी एकत्रिकरणाला सेवाज्येष्ठतेचा खोडाजिल्हांतर्गत बदलीमध्ये विशेष संवर्ग दोनसाठी पात्र असणारे पती, पत्नी शिक्षक एकाच जिल्हा परिषदेत कार्यरत असल्यास त्यांच्या एकत्रिकरणासाठी सरकारने २८ मे २०१९ रोजी परिपत्रक काढून सेवाज्येष्ठतेची अट टाकली आहे़ मात्र, २७ फेबु्रवारी २०१७ च्या परिपत्रकात पती, पत्नी एकत्रिकरणासाठी सेवाज्येष्ठतेची कोणतीही अट नव्हती़ आता सेवाज्येष्ठतेची अट टाकून दोघांपैकी एकाने अर्ज करावा, असा बदल करण्यात आला आहे़ त्यामुळे सेवाज्येष्ठतेची अट पती-पत्नीच्या एकत्रिकरणाला बाधा आणत असून, ही अट रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे़ याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांना निवेदन दिले आहे़ तसेच शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्याशीही चर्चा केली़ यावेळी शिक्षक संजय धामणे, गणेश कुलांगे, बाळासाहेब कासार, संभाजी जाधव, सुरेश कोरडे, सुखदेव आठरे, युवराज जाधव आदी उपस्थित होते़ 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद