शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पाणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: November 29, 2014 00:00 IST

कोपरगाव :भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी दिली़

कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा पाटपाण्याचा संघर्ष संपूर्ण राज्याला माहित आहे़ तुटीच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठी पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना राज्यात नव्याने स्थापन झालेले भाजपाचे सरकार प्राधान्य देईल, भविष्यात पाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी दिली़संजीवनी उद्योग समूहास सभापती हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली़ त्याप्रसंगी त्यांचा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सत्कार केला़ प्रारंभी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून या विधानसभा मतदारसंघाचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मांडले़ यावेळी तहसीलदार इंदिरा चौधरी, मच्छिंद्र टेके, अमित कोल्हे, साईनाथ रोहमारे, विश्वासराव महाले, अरूणराव येवले, बापूसाहेब औताडे, केशव भवर, मच्छिंद्र लोणारी आदी उपस्थित होते़शंकरराव कोल्हे यावेळी म्हणाले, उर्ध्व गोदावरी खोरे अत्यंत तुटीचे आहे़ असे असताना येथील शेतकऱ्यांवरच मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो़ धरणात पाणी असूनही शेतीला ते दिले जात नाही़समन्यायी पाणी वाटपाचा कोलदांडा आमच्या मानगुटीवर बसला आहे़ त्यामुळे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़ गेल्या तीन वर्षापासून येथे दुष्काळ आहे, शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे, त्याला तात्काळ मदत करण्याची मागणी कोल्हे यांनी केली़सभापती हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, माजी मंत्री कोल्हे यांच्या पाण्याच्या अभ्यासाचा उपयोग राज्याला कसा होईल, याचा प्रयत्न करू ़ पाणी कसे वाढवायचे याचे प्रयत्न आपण केले पाहिजे़ तुटीच्या खोऱ्यात पाणी वाढविण्यासाठी जे जे प्रयत्न सिंचन तज्ज्ञांनी सांगितले ते ते पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू ़ स्नेहलता कोल्हे या महिला आमदार म्हणून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी झाल्या़ त्यांनी गोरगरीब उपेक्षित, दीन, दलितांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, आपला आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्याद्वारे विधीमंडळात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सभापती या नात्याने आपण काम करू. शेवटी संचालक बाळासाहेब वक्ते यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)