शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मन:शांतिसाठी युरोपातील तीन देशातील भाविक साईचरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:22 IST

मन:शांतिसाठी शिर्डीला येणारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत युरोपातील श्रीसाई कालेश्वर ट्रस्टच्या अध्यक्षा तातियाना रेन्पल यांनी व्यक्त केले़.

प्रमोद आहेर ।  शिर्डी : युरोपात सुबत्ता असली तरी कॅन्सरपेक्षाही भयानक असलेली मानसिक अस्थिरता व परमेश्वरापासून दूर जाणा-यांची संख्याही वाढते आहे़. या पार्श्वभूमीवर तेथून मन:शांतिसाठी शिर्डीला येणारांचे प्रमाण वाढत असल्याचे मत युरोपातील श्रीसाई कालेश्वर ट्रस्टच्या अध्यक्षा तातियाना रेन्पल यांनी व्यक्त केले़. रेन्पल म्हणाल्या, साईबाबांची मानवतेची, सर्वधर्म समभावाची शिकवण ही आम्हाला इथे आकर्षित करते. आमच्या ट्रस्टशी युरोपातील चौदा देशांचे हजारो नागरिक जोडले गेले आहेत़. अशांततेच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाला साईबाबांचे विचारच वाचवू शकतील. युरोपात भक्तीची वाणवा असल्याने शक्तीचा -हास होतो़. साईबाबांच्या भक्तीने आपोआप शक्ती मिळते, असे रेन्पल यांनी सांगितले. वीस वर्षापूर्वी तातियाना जेव्हा प्रथमच भारत भ्रमण करण्यासाठी आली. तेव्हा शिर्डीच्या साईबाबांविषयी माहिती मिळाली. साईबाबांच्या विचाराचा व शिकवणुकीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून भजनसंध्या, ध्यान, साई आरती, अभिषेक तसेच दर रविवारी एक हजार गरिबांना अन्नदान करण्यात येते. दरवर्षी भारतातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांची सहल काढण्यात येते. त्यात शिर्डीचा हमखास समावेश असतोच. दरवेळी वेगवेगळे भाविक असतात. मंगळवारी (दि़०५) तातियाना जवळपास वीस विदेशी भाविकांना घेऊन तातियाना साईनगरीत आली आहे. यात जर्मनी, रशिया व झेक प्रजासत्ताक येथील नागरिकांचा समावेश आहे. या विदेशी भाविकांचा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, अनिल भणगे, सुनील तांबे आदी उपस्थित होते. ट्रस्टला युरोपमध्ये असलेल्या जर्मनीतील फ्रॅन्कफर्ट शहरात मोठे साईमंदिर उभारायचे आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासन व मेयरशी चर्चाही झाली आहे. देणगीतून हे मंदिर उभारण्यात येणार आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिर