पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्या असलेल्या पिंपळगाव माळवी या गावामध्ये चार विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर असूनही मागील काही दिवसांपासून मोबाइलची रेंज नियमितपणे गायब होत आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या मोबाइल ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नगर शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव माळवी एक मोठे गाव असून गावामध्ये बारावीपर्यंत शाळा, २ बँका, ३ पतसंस्था, सरकारी दवाखाना, पशुवैद्यकीय दवाखाना व इतर शासकीय कार्यालये आहेत. सर्व शासकीय कामकाज ऑनलाइन पद्धतीनेच होत आहे. परंतु, यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. गावामध्ये आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि रिलायन्स या कंपन्यांचे टॉवर आहेत. परंतु, या सर्व टॉवरची लाइट गेली की रेंज गायब होते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या सर्व शैक्षणिक संस्थांचे शालेय अभ्यासक्रमदेखील ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मोबाइल रेंज नियमित न आल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
180721\0019img_20210718_130534.jpg
पिंपळगाव माळवी गावात चार मोबाइल टॉवर आहे परंतु मोबाईल रेंज नियमित गायब होते.