शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका

By अरुण वाघमोडे | Updated: February 17, 2024 17:01 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे.

अरुण वाघमोडे, अहमदनगर: काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच नेत्यांना संपविण्याचे काम करत आहेत. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना त्यांनी मोठा त्रास दिला. तावडे त्यांच्या तावडीत सापडले नाहीत, खडसे बाहेर पडले तर पाटील, बावनकुळे यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. असे सांगत आता पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफर शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.

 शिवसेनेच्या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगर शहरात आलेल्या अंधारे यांनी शनिवारी (दि.१७) येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या. भाजपाला ओबीसीची काळजी असती  तर त्यांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती. मुंडे यांनी आता जास्त अन्याय सहन करू नये. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सोडवू शकते मात्र, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही. हे सरकार आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वाद लावत आहे. राज्यात सरकार प्रायोजित दंगली घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे व नितेश राणे यांचे वक्तव्य जनक्षोभ निर्माण करणारे ठरत आहेत. भाजपाने यांना वेळीच आवर घातली नाही तर राज्यातील परिस्थिती बिघडू शकते. पुणे येथे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा फडणवीस कुठे गेले होते. गुहागर प्रकरणानंतर मात्र त्यांना कंठ फुटला आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थती मोठे विदारक आहे. याकडे सरकारचे लक्ष्य नाही. असे अंधारे म्हणाल्या.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपा