शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

भाजपातील निष्ठावंतांवर सतरंज्या उचलण्याची वेळ; सुषमा अंधारे यांची टीका

By अरुण वाघमोडे | Updated: February 17, 2024 17:01 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे.

अरुण वाघमोडे, अहमदनगर: काँग्रेस-राष्ट्रवादीतून गेलेल्यांना भाजपात न्याय मिळतोय मात्र, भाजपातील निष्ठावंतावर सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्याच नेत्यांना संपविण्याचे काम करत आहेत. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना त्यांनी मोठा त्रास दिला. तावडे त्यांच्या तावडीत सापडले नाहीत, खडसे बाहेर पडले तर पाटील, बावनकुळे यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. असे सांगत आता पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे अशी ऑफर शिवसेनेच्या (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.

 शिवसेनेच्या मुक्त संवाद यात्रेनिमित्त नगर शहरात आलेल्या अंधारे यांनी शनिवारी (दि.१७) येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या. भाजपाला ओबीसीची काळजी असती  तर त्यांनी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती. मुंडे यांनी आता जास्त अन्याय सहन करू नये. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सोडवू शकते मात्र, त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही. हे सरकार आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा-ओबीसीमध्ये वाद लावत आहे. राज्यात सरकार प्रायोजित दंगली घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे व नितेश राणे यांचे वक्तव्य जनक्षोभ निर्माण करणारे ठरत आहेत. भाजपाने यांना वेळीच आवर घातली नाही तर राज्यातील परिस्थिती बिघडू शकते. पुणे येथे पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा फडणवीस कुठे गेले होते. गुहागर प्रकरणानंतर मात्र त्यांना कंठ फुटला आहे. दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थती मोठे विदारक आहे. याकडे सरकारचे लक्ष्य नाही. असे अंधारे म्हणाल्या.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेBJPभाजपा