शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 20:37 IST

मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते.

अहमदनगर/रुईछत्तीसी : नगर-सोलापूर रोडवरील रुईछत्तीसीजवळ असलेल्या अंबिलवाडी  (ता. नगर) येथे झायलो व एसटी़ बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. या अपघातात अरुण बाबुराव फुलसौंदर (वय ६०) ताराबाई शंकरराव भगत (५८ रा. दोघे बुरुडगाव रोड, नगर) व अर्जुन योगेश भगत (वय ८ रा़भगतमळा, सिव्हिल हडको, नगर) यांचा मृत्यू झाला असून आरती योगेश भगत, रत्नमाला अरुण फुलसौंदर, शंकर भगत व कृष्णा भगत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फुलसौंदर व भगत कुटुंबीय शनिवारी झायलो जीपमधून नगर-सोलापूर रोडमार्गे पंढरपूरला जात होते.  झायलो अंबिलवाडी परिसरातून जात असताना राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोट ते मालेगाव ही बस समोरून येत होती.  या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.  हा अपघात इतका भीषण होता की, यात झायलो जीपचा पूर्णत: चक्काचूर झाला. एसटी बसची पुढील एक बाजूही पूर्णपणे आत गेली.  या घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.  या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी झायलोत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रस्ता नव्हे मृत्युचा सापळा नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खराब रस्त्यामुळे दरेवाडी ते मिरजगावपर्यंत वारंवार छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. रुईछत्तीसी व अंबिलवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा बळी गेला आहे. नगर-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ खराब रस्त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. -रवींद्र भापकर, पंचायत समिती सदस्य, नगर तालुका.नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेकांनी जीव गमविला आहे. प्रशासन अजून किती मृत्युची वाट पाहणार आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.- संतोष म्हस्के, संचालक, बाजार समिती.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर