शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 20:37 IST

मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते.

अहमदनगर/रुईछत्तीसी : नगर-सोलापूर रोडवरील रुईछत्तीसीजवळ असलेल्या अंबिलवाडी  (ता. नगर) येथे झायलो व एसटी़ बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि.२८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मयत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून ते झायलोमधून पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. या अपघातात अरुण बाबुराव फुलसौंदर (वय ६०) ताराबाई शंकरराव भगत (५८ रा. दोघे बुरुडगाव रोड, नगर) व अर्जुन योगेश भगत (वय ८ रा़भगतमळा, सिव्हिल हडको, नगर) यांचा मृत्यू झाला असून आरती योगेश भगत, रत्नमाला अरुण फुलसौंदर, शंकर भगत व कृष्णा भगत हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फुलसौंदर व भगत कुटुंबीय शनिवारी झायलो जीपमधून नगर-सोलापूर रोडमार्गे पंढरपूरला जात होते.  झायलो अंबिलवाडी परिसरातून जात असताना राज्य परिवहन महामंडळाची अक्कलकोट ते मालेगाव ही बस समोरून येत होती.  या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.  हा अपघात इतका भीषण होता की, यात झायलो जीपचा पूर्णत: चक्काचूर झाला. एसटी बसची पुढील एक बाजूही पूर्णपणे आत गेली.  या घटनेत बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.  या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी झायलोत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. जखमींना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रस्ता नव्हे मृत्युचा सापळा नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. खराब रस्त्यामुळे दरेवाडी ते मिरजगावपर्यंत वारंवार छोट्या मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. रुईछत्तीसी व अंबिलवाडी परिसरात गेल्या दोन वर्षांत झालेल्या अपघातात २० प्रवाशांचा बळी गेला आहे. नगर-सोलापूर रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे़ प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे़ खराब रस्त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. -रवींद्र भापकर, पंचायत समिती सदस्य, नगर तालुका.नगर-सोलापूर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या अपघातात आजपर्यंत अनेकांनी जीव गमविला आहे. प्रशासन अजून किती मृत्युची वाट पाहणार आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.- संतोष म्हस्के, संचालक, बाजार समिती.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर